AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेत युवासेनेच्या संवाद मेळाव्यात तुफान गर्दी, कोरोना नियमांचे उल्लंघन, कारवाई होणार ?

औरंगाबादेत युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या स्वागतासाठी आज (13 ऑगस्ट) तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. याआधी बीडलादेखील अशाच प्रकारे गर्दी झाली होती.

औरंगाबादेत युवासेनेच्या संवाद मेळाव्यात तुफान गर्दी, कोरोना नियमांचे उल्लंघन, कारवाई होणार ?
aurangabad sanvad yatra
| Edited By: | Updated on: Aug 13, 2021 | 7:51 PM
Share

औरंगाबाद : औरंगाबादेत युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या स्वागतासाठी आज (13 ऑगस्ट) तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. याआधी बीडलादेखील अशाच प्रकारे गर्दी झाली होती. कार्यक्रमात गर्दी झाली तर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी असे सरदेसाई यांनीच यापूर्वी म्हटलं होतं. (corona rules violated in aurangabad yuvasena sanvad yatra will police file case)

स्वागतासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली

शिवसेनेतर्फे युवा संवादाच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधला जातोय. या संवादाची पुण्यातून सुरुवात झाली. आता मराठवाड्यातसुद्धा अशाच पद्धतीने युवा संवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. यावेळी औरंगाबादेत युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या स्वागतासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. तसेच येथे सोशल डिस्टन्सिंग आणि इतर कोरोना नियमांना हरताळ फासण्यात आला.

गर्दी झाल्यास आमच्याविरोधात गुन्हा दाखल करा

कार्यक्रमात गर्दी झाल्यास आमच्याविरोधात गुन्हा दाखल केला तरी आमची हरकत नसेल, असे वक्तव्य सरदेसाई यांनी केले होते. तसेच कार्यक्रमात कोणतीही गर्दी होऊ देणार नाही अशी हमी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात कार्यक्रमात लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तसेच येथे कोरोना नियमांचे लल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. या सर्व प्रकारानंतर आता पोलीस प्रशासन कायद्याप्रमाणे कारवाई करणार का ? असा सवाल विचारला जात आहे.

मराठवाड्यात युवा सेनेची ताकत वाढत आहे

दरम्यान, वरूण सरदेसाई यांच्या उपस्थितीत युवा संवाद मेळावा पार पडला. यावेळी बोलताना वरून सरदेसाई यांनी मराठवाड्यात युवा सेनेची ताकत वाढत असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर कोविड काळात विरोधी पक्षांनी अनेक अडचणी निर्माण करण्याचं काम केलं. मात्र उध्दव ठाकरे यांनी हिंमत न हारता कोरोनाकाळात चांगलं काम केलं. त्यामुळे महाराष्ट्र सुरक्षित राहिला, असे सरदेसाई म्हणाले.

इतर बातम्या :

पंकजा मुंडेंची नाराजी दूर झाली? कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवातच गोपीनाथ गडावरुन, पंकजा काय करणार?

पूरग्रस्तांच्या प्रश्नावरुन राजू शेट्टी आक्रमक, 22 ऑगस्टला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

तो पत्नीवर भडकला, कपाट उघडलं, रिव्हॉल्व्हर काढली आणि पत्नीवर रोखली, कारण…

(corona rules violated in aurangabad yuvasena sanvad yatra will police file case)

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.