AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाच महिलांची हातचलाखी, बसमध्ये बँक मॅनेजरच्या बॅगेतून अडीच लाख लांबवले, पुढे काय घडले?

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 5 लाख रुपयांची रक्कम घेऊन मॅनेजर बसने प्रवास करत होता. यावेळी बसमध्ये बसलेल्या पाच महिला प्रवाशांनी हातचलाखी केली आणि त्यातील अडीच लाख रुपयांची रक्कम काढून घेतली

पाच महिलांची हातचलाखी, बसमध्ये बँक मॅनेजरच्या बॅगेतून अडीच लाख लांबवले, पुढे काय घडले?
औरंगाबादमध्ये बँक मॅनेजरचे पैसे चोरणाऱ्या महिला जेरबंद
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: Anish Bendre | Updated on: Aug 14, 2021 | 11:42 AM
Share

औरंगाबाद : पाच महिलांनी हातचलाखी दाखवत बँक मॅनेजरच्या बॅगेतून अडीच लाख रुपयांची रक्कम लंपास केली. मॅनेजरला वेळीच हा प्रकार लक्षात आला आणि त्याने समयसूचकता दाखवत कंडक्टरला ही गोष्ट सांगितली. त्यानंतर पोलिस स्टेशन गाठत मॅनेजरने तक्रार नोंदवली आणि शेतीच्या बांधावरून पळून जाणाऱ्या महिलांकडे घबाड सापडले. औरंगाबादमध्ये हा थरारक प्रसंग घडला.

नेमकं काय घडलं?

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 5 लाख रुपयांची रक्कम घेऊन मॅनेजर बसने प्रवास करत होता. यावेळी बसमध्ये बसलेल्या पाच महिला प्रवाशांनी हातचलाखी केली आणि त्यातील अडीच लाख रुपयांची रक्कम काढून घेतली. ही रक्कम घेऊन या महिला गोळेगाव या गावात उतरल्या, त्यावेळी मॅनेजरच्या हा प्रकार लक्षात आला.

शेतीच्या बांधावरुन महिलांचा पळून जाण्याचा प्रयत्न

मॅनेजरने तात्काळ ही गोष्ट बस वाहकाच्या कानावर घातली. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनीही तातडीने तपासाची चक्र फिरवली आणि शेतीच्या बांधावरुन पळून जाणाऱ्या महिलांना गाठले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे अडीच लाख रुपयांची रक्कम आढळून आली.

पोलिसात गुन्हा, महिला जेरबंद

त्यानुसार औरंगाबादमधील अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेल्या प्रकारामुळे प्रवासात अत्यंत सतर्क आणि सावध राहणं किती जास्त गरजेचं झालं आहे, हे अधोरेखित आहे. त्याच बरोबर बँक मॅनेजर, बस वाहक, बस चालक आणि पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचंही सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

नवी मुंबईत चोरीसाठी आलेला चोरटा घरातच झोपला

दुसरीकडे, चोरीसाठी घरात घुसलेला चोरटा त्याच ठिकाणी झोपी गेल्याने हाती लागल्याची घटना नवी मुंबईत शुक्रवारी पहाटे घडली. यावेळी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर काही वेळातच अस्वस्थ वाटू लागले. यामुळे त्याला रुग्णालयात घेऊन जात असतानाच मृत्यू झाला. त्याचा मृत्यू घटनास्थळी झालेल्या मारहाणीत झाला की पोलिसांच्या मारहाणीत, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होऊ शकले नसल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

चोरी करायला गेला आणि तिथेच झोपला, चोप देऊन उठवला, पोलिसात नेताच भलतंच घडलं

बड्या पोलिस अधिकाऱ्याच्या दीड कोटींचं लाच प्रकरण, तपासात उकललं विवाहबाह्य संबंधातून झालेल्या एका हत्येचं गूढ

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.