औरंगाबादेत पावसाचा हाहा:कार, पिकं पाण्याखाली, मदतीसाठी प्रयत्न करणार, मंत्री भुमरे यांचे आश्वासन

पार्श्वभूमीवर रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाची तसेच पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार असे आश्वासन दिले.

औरंगाबादेत पावसाचा हाहा:कार, पिकं पाण्याखाली, मदतीसाठी प्रयत्न करणार, मंत्री भुमरे यांचे आश्वासन
SANDIPAN BHUMARE
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 4:06 PM

औरंगाबाद : मागील अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने औरंगाबाद शहर तसेच जिल्ह्यात अक्षरश: हाहा:कार माजवला. औरंगाबादेत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandeep Bhumr) यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाची तसेच पिकाची पाहणी केली. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार असे त्यांनी आश्वासन दिले. (minister Sandeep Bhumre inspected heavy rain affected areas and farms of aurangabad)

संदिपान भुमरे, जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

संदिपान भुमरे यांनी औरंगाबाद आणि पैठण तालुक्यात अृतिवृष्टीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण उपस्थित होते. भुमरे आणि चव्हाण यांनी औरंगाबाद आणि पैठण तालुक्यातील वेगवेगळ्या गावांना भेट दिली. तसेच प्रत्यक्ष जाऊन पावसाची तीव्रता तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानीची पाहणी करताना भुमरे यांच्यासोबत स्थानिक शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी कोणत्या पिकाचे किती नुकसान झाले याची माहिती भुमरे यांना दिली. नंतर जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे, त्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासनही भुमरे यांनी दिले.

औरंगाबादेत पावसाचे रौद्र रुप

औरंगाबादेत 07 सप्टेंबर रोजी दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र संध्याकाळी 7.10 वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता पुढच्या दोन-तीन मिनिटात म्हणजेच 7.12 मिनिटातच पावसानं रौद्र रुप धारण केलं होतं. त्यानंतर आकाशात विजांचा कडकडाट आणि अखंड पाऊसधारांचा वर्षाव हे चित्र तब्बल तासभर चाललं. या तासाभरात शहर आणि परिसरात पावसाचं जणू तांडव नृत्य सुरु होतं. पुढे 8.15 म्हणजेच सव्वा आठच्या सुमारास पावसाचा जोर काहीसा कमी झाला. या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद शहरत तसेच जिल्ह्यात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पिशोर परिसरात 10 गावांचा संपर्क तुटला

कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. अंजना-पळशी मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे. परिणामी अंजना नदीला पूर आला. ही नदी दुथडी भरून वाहू लागल्याने दहा गावांचा संपर्क तुटला. सोमवारी रात्रीपासून पिशोरला मुसळधार पाऊस होत असल्याने पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. मंगळवारी आठवडी बाजार असल्याने गावांतील नागरिकांचे खूप हाल झाल्याचे वृत्त दै. लोकमध्ये प्रकाशित झाले आहे. या परिसरातील भारंबा, भारंबा तांडा, माळेगाव ठोकळ, माळेगाव लोखंडी, कोळंबी, जैतखेडा, साळेगाव, साळेगाव तांडा, पळशी बु., पळशी खुर्द आदी गावांचा पिशोरशी संपर्क तुटला आहे.

इतर बातम्या :

औरंगाबादेत ढगफुटीने हाहाकार, रात्रीतून पावसाचे तांडव, घरात- रस्त्यांवर पाणीच पाणी, ग्रामीण भागात पिकंही वाहून गेली

Aurangabad Festival: बाजारात पर्यावरणपूरक पद्धतीने तयार केलेल्या मखरांची आवक, गणेशभक्तांमध्ये उत्साह

काल लाचखोर नवऱ्याची बायको, आज मांजरीची उपमा, महेबूब शेख यांच्याकडून चित्रा वाघ यांना सणसणीत प्रत्युत्तर

(minister Sandeep Bhumre inspected heavy rain affected areas and farms of aurangabad)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.