AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO: औरंगाबादेत ढगफुटीने हाहाकार, रात्रीतून पावसाचे तांडव, घरात- रस्त्यांवर पाणीच पाणी, ग्रामीण भागात पिकंही वाहून गेली

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Sep 08, 2021 | 5:34 PM
Share
मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने औरंगाबाद शहरातील जालना रोडवर झालेल्या पाणी वाहून जाण्याच्या उपाययोजनांचे पितळ उघड पाडले. दै. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार या रोडवरील साचणारे पाणी वाहून नेण्यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने 13 कोटींहून अधिक खर्च करून साइड ड्रेनची उपाययोजना केली होती. मात्र त्यातून पाणी वाहून न गेल्याने काल संपूर्ण रोडवर पाणी तुंबले. रस्त्यावरील पाण्याने वाहनांमध्ये पाणी शिरून वाहने बंद पडली आणि वाहतूक कित्येक तास खोळंबली.

मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने औरंगाबाद शहरातील जालना रोडवर झालेल्या पाणी वाहून जाण्याच्या उपाययोजनांचे पितळ उघड पाडले. दै. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार या रोडवरील साचणारे पाणी वाहून नेण्यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने 13 कोटींहून अधिक खर्च करून साइड ड्रेनची उपाययोजना केली होती. मात्र त्यातून पाणी वाहून न गेल्याने काल संपूर्ण रोडवर पाणी तुंबले. रस्त्यावरील पाण्याने वाहनांमध्ये पाणी शिरून वाहने बंद पडली आणि वाहतूक कित्येक तास खोळंबली.

1 / 7
 मुसळधार पावसाने सातारा देवळाईकरांचे आतोनात हाल झाले. देवळाई चौक, अयप्पामंदिर चौक, रेणुकामाता कमान, छत्रपती नगर कमान इत्यादी ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. जवळपास दोन-अडीच तास वाहने रस्त्यावर थांबून होती.

मुसळधार पावसाने सातारा देवळाईकरांचे आतोनात हाल झाले. देवळाई चौक, अयप्पामंदिर चौक, रेणुकामाता कमान, छत्रपती नगर कमान इत्यादी ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. जवळपास दोन-अडीच तास वाहने रस्त्यावर थांबून होती.

2 / 7
सातारा परिसरातील बीड बायपास रोडवरचे रात्रीचे हे दृश्य. अनेक ठिकाणू मूळ ओढ्याचे, नाल्याचे स्रोत अडवले गेल्यामुळे नैसर्गिकरित्या वाहून जाणारे पाणी येथे अडवले गेले आहे. त्यामुळे सातारा-देवळाई परिसरात अशी पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांचे म्हणणे आहे. आधीच रस्तेदुरुस्तीच्या कामांना लागणाऱ्या विलंबाने त्रस्त असलेल्या या परिसरातील नागरिकांना कालच्या पावसाने घराबाहेर कसे पडायचे, हाच प्रश्न सतावत आहे.

सातारा परिसरातील बीड बायपास रोडवरचे रात्रीचे हे दृश्य. अनेक ठिकाणू मूळ ओढ्याचे, नाल्याचे स्रोत अडवले गेल्यामुळे नैसर्गिकरित्या वाहून जाणारे पाणी येथे अडवले गेले आहे. त्यामुळे सातारा-देवळाई परिसरात अशी पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांचे म्हणणे आहे. आधीच रस्तेदुरुस्तीच्या कामांना लागणाऱ्या विलंबाने त्रस्त असलेल्या या परिसरातील नागरिकांना कालच्या पावसाने घराबाहेर कसे पडायचे, हाच प्रश्न सतावत आहे.

3 / 7
शहरातील उस्मानपुरा भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने प्रचंड हाल झाले. रात्रीतून सुरु झालेल्या पावसाच्या तांडवामुळे अनेक घरातील नागरिकांना डोळ्यादेखत घरातील वस्तू, साहित्य पाण्यात गेल्याचे चित्र पहावे लागले. अनेक घरात तीन-चार फुट उंचीपर्यंत पाणी साठल्याने नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे.

शहरातील उस्मानपुरा भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने प्रचंड हाल झाले. रात्रीतून सुरु झालेल्या पावसाच्या तांडवामुळे अनेक घरातील नागरिकांना डोळ्यादेखत घरातील वस्तू, साहित्य पाण्यात गेल्याचे चित्र पहावे लागले. अनेक घरात तीन-चार फुट उंचीपर्यंत पाणी साठल्याने नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे.

4 / 7
पाचोड खुर्द परिसरात ढगफुटीने प्रचंड हाहाकार माजवला. गावकऱ्यांच्या अंगणात, घरात पाणी शिरल्याने अनेक संसार विस्कळीत झाले. घरातील भांडी आणि संसारोपयोगी वस्तू तशाच ठेवून  नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी कमी पाणी असलेल्या भागात अशा रितीने एकवटले होते. मध्यरात्रीतून पावसाचा जोर आणखी वाढेल या भीतीने नागरिकांची गाळण उडाली.

पाचोड खुर्द परिसरात ढगफुटीने प्रचंड हाहाकार माजवला. गावकऱ्यांच्या अंगणात, घरात पाणी शिरल्याने अनेक संसार विस्कळीत झाले. घरातील भांडी आणि संसारोपयोगी वस्तू तशाच ठेवून नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी कमी पाणी असलेल्या भागात अशा रितीने एकवटले होते. मध्यरात्रीतून पावसाचा जोर आणखी वाढेल या भीतीने नागरिकांची गाळण उडाली.

5 / 7
संग्रहित छायाचित्र.

संग्रहित छायाचित्र.

6 / 7
पिशोर येथील शफेपुर भागातील खडकी नदीला आलेल्या महापुरामुळे नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते. अनेकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य वाहून गेले.तर परिसरातील नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. शासनाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची ग्रामस्थ मागणी करीत आहे.

पिशोर येथील शफेपुर भागातील खडकी नदीला आलेल्या महापुरामुळे नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते. अनेकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य वाहून गेले.तर परिसरातील नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. शासनाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची ग्रामस्थ मागणी करीत आहे.

7 / 7
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...