AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेत आणखी एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू, तीन दिवसांतील तिसरी घटना

औरंगाबाद शहरात पाण्यामध्ये बुडून मृत्यू होत असल्याच्या घटना थांबवण्याचे नाव घेत नाहीयेत. आज (20 जुलै) औरंगाबाद येथील हर्सूल तलावामध्ये बुडून आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला.

औरंगाबादेत आणखी एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू, तीन दिवसांतील तिसरी घटना
पाझर तलावाचे संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jul 20, 2021 | 7:51 PM
Share

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात पाण्यामध्ये बुडून मृत्यू होत असल्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. आज (20 जुलै) औरंगाबाद येथील हर्सूल तलावामध्ये बुडून आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला. सौरभ शंकर पदमाने असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. वैद्यकीय औषधी विभागात काम करत असल्याचे ओळखपत्र मृत युवकाच्या खिशात आढळले आहे. (young man drowned in aurangabad harsul lake)

बुडालेला युवक औषधी विभागात नोकरीला

मिळालेल्या माहितीनुसार सौरभ शंकर पदमाने नावाचा एक तरुण शहरातील हर्सूल तलावाजवळ गेला होता. यावेळी तो पाण्यात बुडाला. ही घटना समजताच या परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर शहरातील अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बुडालेल्या युवकाला तलावाच्या बाहेर काढले. वैद्यकीय औषधी विभागात काम करत असल्याचे ओळखपत्र मृत युवकाच्या खिशात आढळले आहेत. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी या युवकास मृत घोषित केले.

पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची तिसरी घटना

सध्या औरंगाबाद जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी भरपूर पाऊस झाल्यामुळे तलाव, नद्या, ओढे, भरले आहेत. तसेच अनेक ठिकाणचे धबधबेसुद्धा वाहू लागले आहेत. याच कारणामुळे हिरवाई पाहण्यासाठी तसेच पर्यटनासाठी शहरातील अनेक तरुण फिरायला जात आहेत. यादरम्यान, पोहताना तेसच इतर कारणांमुळे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना औरंगाबादमध्ये मागील काही दिवसांपासून घडत आहेत.

औरंगाबादेत 18 जुलै रोजी दोघांचा मृत्यू

औरंगाबाद येथे 18 जुलै रोजी सातारा डोंगरात ट्रेकिंक करायला एकूण सात मित्र गेले होते. हे सातही जण डोंगर परिसरातील तलावात गेले होते. मात्र, यावेळी तलावात बुडून एकाचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या घटनेत इतर सहा जण सुदैवाने बचावले होते. लखन ईश्वर पवार वय-19 (रा.शिव शंकर कॉलोनी,औरंगाबाद) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव होते. तर याच दिवशी मित्रांसोबत पोहायला गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. आदिल शेख असे या मुलाचे नाव असून केंब्रिज जवळच्या डोहात ही घडना घडली होती. आदिल शेख हा सहा फूट खोल पाण्यात बुडाल्यानंतर मित्रांनी आरडाओरड केली होती. मात्र, मदतीस उशीर झाल्याने या मुलाने प्राण सोडला होता.

इतर बातम्या :

Video | औरंगाबादेत वेरुळजवळ रस्ता खचला, तब्बल 10 फुटांपेक्षाही पडला मोठा खड्डा, पूल कोसळण्याची भीती

Video : औरंगाबादमध्ये गादीच्या कारखान्याला भीषण आग, आगीत कारखान्याचं मोठं नुकसान

7 दिवसांची मेहनत, 9 फुटांची रांगोळी, औरंगाबादच्या आसावरीने साकारला हुबेहूब विठ्ठल

(young man drowned in aurangabad harsul lake)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.