AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी, मंत्रिमंडळ विस्तारावरुन बच्चू कडू यांची नाराजी, राज्य सरकारमधील आमदारांमध्ये धुसफूस?

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खूप मोठी बातमी समोर आलीय. मंत्रिमंडळ विस्तारावरुन आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केलीय.

सर्वात मोठी बातमी, मंत्रिमंडळ विस्तारावरुन बच्चू कडू यांची नाराजी, राज्य सरकारमधील आमदारांमध्ये धुसफूस?
आमदार बच्चू कडू
| Updated on: Jan 07, 2023 | 6:55 PM
Share

स्वप्निल उमप, टीव्ही 9 मराठी, अमरावती : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खूप मोठी बातमी समोर आलीय. मंत्रिमंडळ विस्तारावरुन आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केलीय. मंत्रिमंडळ विस्तार होणार नसेल तर स्पष्ट सांगा, असं आवाहन बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलंय. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन सहा महिने उलटले तरी राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अद्याप झालेला नाही. मंत्रिंडळ विस्तारावरुन सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांकडून आता वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. असं असताना सत्ताधारी पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी उघडपणे जाहीर केलीय. बच्चू कडू यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देत आपली नाराजी व्यक्त केली.

“आम्हालाही असं वाटतंय की, एकतर विस्तार करु नका. डायरेक्ट सांगून द्या की, विस्तार होत नाही. सगळे शांततेने सरकारसोबत राहतील”, असं बच्चू कडू म्हणाले.

“ते काय म्हणतात? फुल काढायचं, पुन्हा खिशात ठेवायचं, काय टेक्निकल बाबी असतील ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगाव्यात. या अडचणी आहेत, यामुळे विस्तार होऊ शकत नाही”, असं बच्चू कडू म्हणाले.

“सगळे 60 आमदार कुणीही काय बोलणार नाही. एकतर करा, नाही होत असेल तर स्पष्ट सांगा. कारण बऱ्याच आमदारांमध्ये कुजबूज चालू आहे”, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.

“जे 50-60 आमदार आहेत, याशिवाय मीडियावाले विचारता कधी होणार विस्तार, ते काही माझ्या हाती आहे का? हा प्रश्न तुम्ही शिंदे आणि फडणवीस यांना विचारायला पाहिजे”, असं बच्चू कडू म्हणाले.

“माझे दोन आमदार आहेत. दोन आमदाराच्या माणसाला मंत्रिमंडळ ठरवण्याचा अधिकार नाहीय. पण येस किंवा नो ते सांगून टाकलं पाहिजे”, असं आवाहन त्यांनी केलं.

“देवेंद्र फडणवीस सांगत होते की अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करु. नंतर अधिवेशन झालं. काही टेक्निकल प्रोब्लेम असेल. आमची त्यावर काही नाराजी नाहीय. पण माझं म्हणणं आहे की, स्पष्टपणे सांगून दिलं पाहिजे”, असं ते म्हणाले.

“हे काम प्रमुख लोकांचं आहे. त्यांनी स्पष्ट करुन सांगायला पाहिजे. त्यातून जनतेमधील संभ्रम दूर केला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.