AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhananjay Munde : 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असूनही परळीला निधी नाही, इथले लोकप्रतिनिधी करतात काय? धनंजय मुंडेचा प्रीतम मुंडेंना सवाल

छत्तीसगडमधील वैद्यनाथ धाम हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी नाही, तरी त्याला केंद्र सरकार 1600 कोटी निधी देते. मात्र आपले परळी ज्योतिर्लिंगांमध्ये येत असूनही निधी नाही, याबद्दल धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली.

Dhananjay Munde : 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असूनही परळीला निधी नाही, इथले लोकप्रतिनिधी करतात काय? धनंजय मुंडेचा प्रीतम मुंडेंना सवाल
परळीतील कार्यक्रमात प्रीतम मुंडेंवर टीका करताना धनंजय मुंडेImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 24, 2022 | 10:06 PM
Share

परळी, बीड : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असूनही आपल्या परळीला केंद्र सरकारमधून (Central Government) एक रुपयाही येऊ शकत नाही, हे इथल्या लोकप्रतिनिधीचे अपयश आहे, असा निशाणा आमदार धनंजय मुंडे यांनी खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांच्यावर साधला आहे. ते परळीत बोलत होते. परळी शहरातील विद्यानगर भागात महात्मा बसवेश्वर उद्यानाच्या उभे करण्यात आले आहे. याच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. मुंडे बहीण-भावांमध्ये नेहमीच एकमेकावर राजकीय टीकाटिप्पण्या सुरूच असतात. यातच आता माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केंद्र सरकारच्या निधी मंजूर करून आणण्यात बीडच्या खासदार कशा अपयशी ठरतात, यावरून टोला लगावला आहे. नाव न घेता त्यांनी खा. प्रीतम मुंडे यांच्यावर हा हल्लाबोल केला.

‘इथल्या लोकप्रतिनिधींना अपयश’

धनंजय मुंडे यांनी सांगितले, की बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या आपल्या परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगासाठी आपण मंत्री असताना राज्य शासनाकडून 133 कोटी रुपये तीर्थक्षेत्र विकासासाठी मंजूर करून आणले. मात्र बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असूनही केंद्र शासनाचा निधी मात्र मिळवून घेण्यात इथल्या लोकप्रतिनिधींना अपयश आले. एका बाजूला दुसऱ्या राज्यातील वैद्यनाथ धामसाठी केंद्र सरकार 1600 कोटी रुपये निधी देते आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असूनही आपल्या परळीला मात्र केंद्र सरकार मधून एक रुपया येऊ शकत नाही हे इथल्या लोकप्रतिनिधीचे अपयश असल्याचा निशाणा त्यांनी लगावला.

‘त्यांनी आतापर्यंत काय केले?’

छत्तीसगडमधील वैद्यनाथ धाम हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी नाही, तरी त्याला केंद्र सरकार 1600 कोटी निधी देते. मात्र आपले परळी ज्योतिर्लिंगांमध्ये येत असूनही निधी नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. विकास करणे, 100, 200 कोटी रुपये निधी आणणे काही मोठी गोष्ट नाही. केंद्र सरकारमध्ये कोणीही असले तरी आपण आपले संबंध, ताकद, प्रतिष्ठा मिळवली, असे ते म्हणाले. मात्र जे लोक सभागृहात या भागाचे प्रतिनिधित्व करतात, त्यांनी आतापर्यंत काय केले, असा सवाल त्यांनी केला आहे. तर विकासाची जबाबदारी आता आपण घेतली आहे, असे मुंडे म्हणाले.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.