AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“भाजपची जिथं विचारधारा रुजली, तेथील पराभवाचं चिंतन करू”; पोटनिवडणुकीच्या निकालाचा या नेत्यानी कारण सांगितलं

भाजपच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीच्या उमेदवाराने धूळ चारल्यामुळे कसबा पोटनिवडणुकीचा निकाल आता भाजपच्या वर्मी लागला आहे.

भाजपची जिथं विचारधारा रुजली, तेथील पराभवाचं चिंतन करू; पोटनिवडणुकीच्या निकालाचा या नेत्यानी कारण सांगितलं
| Edited By: | Updated on: Mar 02, 2023 | 11:29 PM
Share

बीड : कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला आहे, मात्र ज्या मतदार संघात भारतीय जनता पक्षाचा विचार रुजला होता, त्या मतदार संघात पराभव का झाला आहे त्याचे आम्ही आत्मचिंतन करू असं स्पष्ट मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. भाजपच्या माजी आमदार आणि नेत्या पंकजा मुंडे यांनी या निवडणुकीचं विश्लेषण करताना त्यांनी या मतदार संघाचा इतिहास सांगितला.

कसबा मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला होता, मात्र कित्येक वर्षानंतर या मतदार संघामध्ये भाजपचा पराभव झाला आहे.

याच मतदार संघामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी भाजपला विजयी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. तरीही या मतदार संघामध्ये भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींपासून ते अगदी कार्यकर्त्यांपर्यंत या पराभवाचे आत्मचिंतन करणार असल्याच पंकजा मुंडे यांनी सांगितेल.

पंकजा मुंडे यांनी कसबा पोटनिवडणुकीविषयी बोलताना त्यांनी या निवडणुकीत झालेला पराभव आम्ही स्वीकारला आहे. मतदारांच्या भावनांची आम्ही कदर करतो असं सांगत भविष्यात मतदारांना सोयी सुविधा देण्याबरोबरच विकासासाठी आम्ही प्रयत्न करु असंही त्यानी यावेळी अश्वासन दिले आहे.

कसबा पोटनिवडणूक ही महाविकास आघाडी आणि शिंदे फडणवीस सरकार असल्यामुळे शिवसेना आणि भाजपसाठी ही प्रतिष्ठेची बाब बनली होती. या निवडणुकीच्या प्रचारासाठी सरकारमधील अर्ध्यापेक्षा अधिक मंत्री हे कसबा पोटनिवडणुकीसाठी ठाण मांडून बसले होते.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी या ठिकाणी सभा घेऊन अश्वासनांचा पाऊस पाडला होता. या निवडणुकीच्या प्रचारावेळी रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच पैसे वाटणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली होती

Follow Us
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.