AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! मतदानाच्या दिवशीच अजितदादांचा भाजपाला दणका, बलाढ्य नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश; भाजपात खळबळ

Ajit Pawar : अजित पवारांनी आगामी ZP निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला मोठा धक्का दिला आहे. एका बड्या नेत्याने आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे.

मोठी बातमी ! मतदानाच्या दिवशीच अजितदादांचा भाजपाला दणका, बलाढ्य नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश; भाजपात खळबळ
Ajit Pawar and FadnavisImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 15, 2026 | 9:59 PM
Share

राज्यात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. आज राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. उद्या महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना आतापासूनच या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आज अजित पवारांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला मोठा धक्का दिला आहे. एका बड्या नेत्याने आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय समीकरण बदलताना दिसणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विजयराज डोंगरे आणि मनोहर डोंगरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

निवडणूक आयोगाने राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचाही समावेश आहे. या निवडणुकीपूर्वी अजित पवारांनी भाजपाला मोठा दणका दिला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज डोंगरे आणि लोकशक्ती परिवाराचे प्रमुख मनोहर डोंगरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्तांसह बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजित पवार यांनी या सर्व नेत्यांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. यामुळे पक्षाला आणखी बळकटी मिळाल्याची भावना अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

मनोहर डोंगरे होते जिल्हाध्यक्ष

मोहोळसह सोलापूरच्या इतर तालुक्यांमध्येही लोकशक्ती परिवाराचा चांगला प्रभाव आहे. मनोहर डोंगरे हे पूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात त्यांना मानणारा वर्ग आहे. आता लोकशक्ती परिवाराने भाजपाची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीपूर्वी हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे आगामी काळात राजकीय गणितं बदलणार आहेत.

5 फेब्रुवारीला मतदान

दरम्यान, निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 16 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी होईल. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. निवडणूक चिन्ह आणि अंतिम उमेदवार यादी 27 जानेवारी दुपारी 3.30 वाजेनंतर जाहीर केली जाणार आहे. मतदान 5 फेब्रुवारी सकाळी 7 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत असेल. मत मोजणी आणि निकाल 7 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे.

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.