AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधान परिषद निवडणुकीत महायुतीला जबर धक्का, ज्या जागेसाठी लागली प्रतिष्ठा पणाला तिथेच झाला मोठा गेम, ते सीट धोक्यात?

आज विधान परिषद निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. आता अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. मात्र काही ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवल्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

विधान परिषद निवडणुकीत महायुतीला जबर धक्का, ज्या जागेसाठी लागली प्रतिष्ठा पणाला तिथेच झाला मोठा गेम, ते सीट धोक्यात?
महायुतीला मोठा धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 04, 2026 | 4:34 PM
Share

आज विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीच्या गोटात घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळालं. विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं पहायला मिळालं. इच्छा असूनही ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, अशा नेत्यांनी बंडखोरी करत या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ही बंडखोरी महायुतीसाठी डोकेदुखीचा विषय ठरू शकते असं वाटत असताना, अनेक ठिकाणची बंडखोरी मोडून काढण्यात महायुतीला यश मिळालं. मात्र ज्या विधान परिषदेच्या जागेकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं, तिथे मात्र महायुतीला मोठा धक्का बसला आहे.

नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. नाशिक विधान परिषदेची जागा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली आहे. नाशिकमधून नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. परंतु जागा वाटप होण्याच्या आधीच भाजपच्या वतीने गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर दुसरीकडे त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान गीते बंधू यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घ्यावेत यासाठी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे यांचे प्रयत्न सुरू होते. अर्ज माघे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

परंतु गोकुळ गीते ही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत, त्यांनी शेवटच्या दिवशी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नसल्याने आता नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठं ट्विस्ट निर्माण झालं असून, ही लढत आता शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दराडे आणि गीते यांच्यामध्ये होणार आहे. नरेंद्र दराडे यांच्यासमोर गोकुळे गीतेच्या रुपानं मोठं आवाहान निर्माण झालं आहे. गोकुळ गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले मात्र तरी देखील गोकुळ गीते हे निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले आहेत.

Follow Us
शेवटी रायगडची निवडणूक बिनविरोध, अनिकेत तटकरे होणार आमदार!
Sunil Tatkare | शेवटी रायगडची निवडणूक बिनविरोध, अनिकेत तटकरे होणार आमदार!
भाजपाला सर्वात मोठा धक्का, गोकुळ गीतेंची माघार नाहीच, बाप काढल्याने...
भाजपाला सर्वात मोठा धक्का, गोकुळ गीतेंची माघार नाहीच, बाप काढल्याने नाशकात संघर्ष अटळ!
ठाकरेंच्या सेनेला दुसरा मोठा दणका! आणखी एका नेत्याचा उमेदवारी अर्ज माग
ठाकरेंच्या सेनेला दुसरा मोठा दणका! आणखी एका नेत्याचा उमेदवारी अर्ज मागे, 15 मिनिटांत झाला मोठा गेम!
उमेदवारी मागे घेताच ठाकरेंचा दणका; बाळ मानेंची ठाकरे सेनेतून हकालपट्टी
मोठी बातमी! उमेदवारी मागे घेताच उद्धव ठाकरेंचा दणका; बाळ माने यांची ठाकरे सेनेतून हकालपट्टी
भाजपवर हल्लाबोल अन्.... सत्तारांच्या त्या वक्तव्याने महायुतीत खळबळ
Vidhan Parishad Election | भाजपवर हल्लाबोल अन् आता मंत्रीपदावर दावा; सत्तारांच्या त्या वक्तव्याने महायुतीत पुन्हा खळबळ
कोकणात ठाकरेंच्या सेनेला मोठा झटका! गळाभेट, जिल्हाधीकारी कार्यालय अन्
कोकणात ठाकरेंच्या सेनेला मोठा झटका! गळाभेट, जिल्हाधीकारी कार्यालय अन् नितेश राणेंनी टप्प्यात केला कार्यक्रम
महागाईने जनतेचं कंबरडचं मोडलं; सेनेने रस्त्यावर उतरून सरकारला घेरलं!
Shivsena Thackeray Protest | महागाईने जनतेचं कंबरडचं मोडलं; ठाकरेंच्या सेनेने रस्त्यावर उतरून सरकारला घेरलं!
पुढच्या एक वर्षानंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसतील; राहुल गांधींचा
पुढच्या एक वर्षानंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसतील; राहुल गांधींचा खळबळजनक दावा
आला रे आला... आता ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होणार....
आला रे आला... आता ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होणार... छत्र्या, रेनकोट काढून ठेवा; मान्सून अखेर केरळात
शिवसेनेला जेमतेम 4 जागा, त्यातही... गुलाबराव पाटलांनी नराजीच्या सुरात
शिवसेनेला जेमतेम 4 जागा, त्यातही... गुलाबराव पाटलांनी नराजीच्या सुरात सगळंच सांगितलं