AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लिम समाजाला आता कळून चुकलय की, उद्धव ठाकरे हे…भाजप जिल्हाध्यक्षाचे जिव्हारी लागणारे शब्द

"युतीमध्ये किती जागा शिंदे गटाला द्याव्या, किती जागा भाजपने लढवाव्यात हे मी सांगणं उचित नाही. आज त्यावर निर्णय होईल. मात्र पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि सुरेश वरपूडकर वॉर्ड निहाय अभ्यास करत आहेत"

मुस्लिम समाजाला आता कळून चुकलय की, उद्धव ठाकरे हे...भाजप जिल्हाध्यक्षाचे जिव्हारी लागणारे शब्द
uddhav Thackeray
| Updated on: Dec 26, 2025 | 1:39 PM
Share

खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान म्हणजे भाजपला मतदान असं वक्तव्य केलं होतं. त्यावर सुरज भुमरे यांनी उत्तर दिलं आहे. “खासदार संजय जाधव यांनी आजवर खान पाहिजे की बाण पाहिजे यावर राजकारण केले. मात्र जनता सुज्ञ झाली आहे. जनता आता भाजपच्या मागे आहे, झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाने भरभरून भाजपला मतदान केले, विकास कोण करू शकते हे जनतेला आता माहीत झाले आहे” असं भाजप जिल्हाध्यक्ष सुरज भुमरे म्हणाले. “लोकसभेला आणि विधानसभेला त्यांना मुस्लिम मतदान झालं म्हणून त्यांचं साधून गेलं. मात्र नगरपालिकेला त्यांना मतदान मिळालं नाही. कारण मुस्लिम समाजाला हे आता कळून चुकलं, त्यांचे नेते उद्धव ठाकरे पाच वर्षे घराबाहेर निघत नाही, त्यामुळे जनतेला त्यांच्यावरचा विश्वास उडून गेला आणि त्यामुळेच नगरपालिकेत परभणी जिल्हा काँग्रेस आणि उद्धव सेना मुक्त झाला” असं भाजप जिल्हाध्यक्ष सुरज भुमरे म्हणाले.

“युतीमध्ये किती जागा शिंदे गटाला द्याव्या, किती जागा भाजपने लढवाव्यात हे मी सांगणं उचित नाही. आज त्यावर निर्णय होईल. मात्र पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि सुरेश वरपूडकर वॉर्ड निहाय अभ्यास करत आहे. पूर्ण ताकदीने भाजप या महापालिका निवडणुकीत उतरणार आहे” असं सुरज भुमरे म्हणाले.

जागांबाबत आमचं घोडं अडलेलं नाही

“मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर येथे आज बैठक होणार आहे. त्या बैठकीत शिवसेनेसोबत युती संदर्भात स्थिती स्पष्ट होईल.जागांबाबत आमचं घोडं अडलेलं नाही. आज स्थिती स्पष्ट होणार आहे” असं सुरज भुमरे म्हणाले.

तर शिवसेना त्यांच्यात नसेल

पुणे, पिंपरी चिंचवड पालिकेत महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवेंनी एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. “हा दोन पक्षांचा स्वतंत्र विषय आहे. शरद पवार यांनी आमच्याशीही चर्चा केली, येणाऱ्या काळात काय होईल माहिती नाही. मात्र, अजित पवार व शरद पवार एकत्र आले तर शिवसेना त्यांच्यात नसेल” असं अंबादास दानवे म्हणाले.

Follow Us
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली