AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्याने राहुल गांधी नाराज? अमित शाह यांचा काँग्रेसमध्ये घमासानचा दावा

बुलढाण्यातील मलकापूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. यावेळी अमित शाह यांनी मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याबाबत धक्कादायक दावा केला. त्यांच्या वक्तव्यावर आता काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्याने राहुल गांधी नाराज? अमित शाह यांचा काँग्रेसमध्ये घमासानचा दावा
अमित शाह यांचा काँग्रेसमध्ये घमासानचा दावा
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 10, 2024 | 4:08 PM
Share

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे सभा पार पडली. या सभेत अमित शाह यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याबाबत धक्कादायक दावा केला. “मी सर्वांना सांगू इच्छितो, महाविकास आघाडीने भरपूर गॅरंटी दिल्या आहेत. पण आताच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे खरं बोलून गेले. त्यामुळे काँग्रेस खासदार राहुल गांधी हे नाराज झाले. पूर्ण होतील असेच आश्वासने द्या, असं मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. कारण काँग्रेसने कर्नाटक, हिमाचल, तेलंगणामध्ये जेवढ्या गॅरंटी दिल्या त्या पूर्ण झाल्या नाहीत. ही महाविकास आघाडीची गॅरंटी झूठची गॅरंटी आहे. ही गॅरंटी भ्रष्टाचाराची गॅरंटी आहे. महाविकास आघाडीची गॅरंटी ही भाऊ-पुतण्या वाद आणि तुष्टीकरणाची गॅरंटी आहे”, अशी टीका अमित शाह यांनी केली.

“आज शिवप्रताप दिवस आहे. 10 नोव्हेंबरलाच शिवाजी महाराजांनी आज अफजल खानाचा वध करुन विजापूरला करारा जवाब दिला होता. आज शिवप्रताप दिनाच्या दिवशी सर्वांनी इथून एक संकल्प घेऊन जायचा आहे की, अफजल खानाच्या मार्गावर चालणाऱ्या महाविकास आघाडीचा पराभव करायचा आहे. मला सांगा, आमच्या चारही उमेदवारांना तुम्ही जिंकवणार ना? ही लढाई शिवाजी महारांजा मार्ग आणि अफजल खानचा मार्ग यांच्यामधली लढाई आहे”, असा दावा अमित शाह यांनी केला.

‘अयोध्येत राम मंदिर बनायला हवं होतं की नाही?’

“या आघाडीने तृष्टीकरणाची सीमा गाठली. अयोध्येत राम मंदिर बनायला हवं होतं की नाही? 70 वर्षांपासून काँग्रेस पक्ष राम मंदिराच्या मुद्द्याला लटकवत राहिला. मोदींना तुम्ही पंतप्रधान केलं, यानंतर 5 वर्षात कोर्टात केस जिंकली आणि मंदिरदेखील बांधून दाखवलं. या दीपावलीला 550 वर्षांनंतर रामलल्ला आपल्या भव्य मंदिरात बसले आहेत. केवळ राम मंदिरच नाही तर औरंगजेबाने काशी, विश्वनाथ कॉरिडोअर तोडलं होतं. मोदींनी काशी, विश्वनाथ कॉरिडोअर देखील पुन्हा बनवलं. तुटलेलं सोमनाथचं मंदिर नवं बनलंच होतं, आता मोदींच्या नेतृत्वात सोमनाथांचं मंदिर सोन्याचं बनत आहे”, असं अमित शाह म्हणाले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी