AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय, सावधान! ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे

रस्ता मोकळा असल्याने सुसाट वाहन चालवली जातात. पण, तोल गेल्यास अपघात होतात. त्यावर नियंत्रण घालणे गरजेचे आहे. यासाठी परिवहन विभागाने एक मोहीम सुरू केली आहे.

समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय, सावधान! ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे
| Updated on: May 06, 2023 | 3:58 PM
Share

गणेश सोळंकी, प्रतिनिधी, बुलढाणा : समृद्धी महामार्गावर अपघात होत आहेत. याला वेगवेगळे कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे वाहनांची वेग मर्यादा होय. रस्ता मोकळा असल्याने सुसाट वाहन चालवली जातात. पण, तोल गेल्यास अपघात होतात. त्यावर नियंत्रण घालणे गरजेचे आहे. यासाठी परिवहन विभागाने एक मोहीम सुरू केली आहे. ती वाहनांच्या वेगावर मर्यादा आणणारी आहे. स्पीड लिमिट ओलांडल्यास सुरुवतीला ताशी १२० च्या आत वाहन चालवण्याची सूचना दिली जाईल. त्यानंतर वेग कमी होत नसेल तर दंडसुद्धा केला जाऊ शकतो.

सावधान, समृद्धी महामार्गावर आता एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीम राबविली जातेय. जर तुम्ही स्पीड लिमिट ओलांडली तर तुमचे वाहन होऊ शकते ब्लॅक लिस्ट.. शिवाय एका इंटरचेंज दुसऱ्या इंटरचेंजला जर ठरलेल्या वेळेच्या आत पोहचाल तर सायरन वाजेल.

SAMRUDHI 2 N

अन्यथा दंड भरावा लागेल

समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना आता स्पीड ओलांडली तर आपले वाहन ब्लॅक लिस्ट होऊ शकते. त्यामुळे आपले वाहन ठरलेल्या वेळेतच चालवावे. अन्यथा आपल्याला दंडही भरावा लागेल. असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागाने केलंय.

वाहन ब्लॅकलिस्ट होणार

समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनाचा अपघात होऊ नये. यासाठी जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून विविध मोहिमा राबवल्या जात आहेत. यामध्ये आता परिवहन विभागाकडून वाहनांना ब्लॅक लिस्ट आणि दंडही केला जात आहे. समृद्धी महामार्गावर नागपूर ते मुंबई चार ठिकाणी इंटर चेंज आहे.

SAMRUDHI 3 N

टोल नाक्यावर वाजेल सायरन

जर वाहन एका इंटरचेंजवरून दुसऱ्या इंटरचेंजला ठरलेल्या वेळेच्या आत पोहचले तर त्या टोल नाक्यावर सायरन वाजेल. ते वाहन काही वेळेसाठी ब्लॅक लिस्ट होईल. एवढेच नव्हे तर उपप्रादेशिक विभागाकडून त्या चालकाचे समुपदेशन करण्यात येईल.

वेगमर्यादा १२०

संबंधिताला वाहन 120 वेगाच्या आतच चालवण्याचे आवाहन करण्यात येईल. एवढेच नव्हे तर चालकाने पुनः पुन्हा वेळेची मर्यादा ओलांडली तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा प्रस्तावित करण्यात येईल. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.