AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“काय उखाडायचे ते उखाडून घ्या…”; शिवसेनेच्या आमदाराने विरोधकांना खडसावून सांगितले…

शहरात आणखी शंभर पाचशे टपऱ्या उभारणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. त्यामुळे कुणाला काय उखाडायचे ते उखाडून घ्या, असं म्हणत संजय गायकवाड यांनी विरोधकांना थेट इशाराच दिला आहे.

काय उखाडायचे ते उखाडून घ्या...; शिवसेनेच्या आमदाराने विरोधकांना खडसावून सांगितले...
| Edited By: | Updated on: Apr 19, 2023 | 7:01 PM
Share

बुलढाणा : बुलढाणा शहरातील विकासावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप टोकाला गेले आहेत. एकीकडे राज्यात अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावरून राजकारण ढवळून निघाले असतानाच आता बुलढाणा शहरातील शिवसेना आणि काँग्रेस हा वादही आता टोकाला पोहचला आहे. शहरातील विकासाच्या मुद्यावरून आता आमदार धीरज लिंगाडे आणि आमदार संजय गायकवाड यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे. त्यावरून आता आमदार संजय गायकवाड यांनी अतिक्रमणाच्या मुद्यावरून काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका टिपण्णी केल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, शहरातील ज्या टपऱ्यांच्या अतिक्रमाणाविषयी टीका केली जात आहे.

त्या टपऱ्या सगळ्या गोरगरीबांच्या आहेत आणि त्या जर गोरगरीबांच्या टपऱ्या असतील तर आम्ही आणखी 100-500 टपऱ्यांचे अतिक्रमण करणार असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.

यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्यावर टीका करताना म्हणाले की, बुलढाणा नगरपालिकेत आमदार धीरज लिंगाडे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विषयावर चर्चा केली होती. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ देखील या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीवेळी त्यांनी गावातील अतिक्रमणधारकांचा मुद्दाही उचलून धरला होता. त्यावरूनच शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षात माजी आमदार सपकाळ यांनी एक टक्काही काम केलं नाही.

त्यामुळे त्यांना या अतिक्रमणाविषयी बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. शहरातील ज्या काही टपऱ्या आहेत, त्या गरीबांच्या टपऱ्या आहेत.त्यामध्ये काय आमचे नातेवाईक राहत नाहीत.

त्यामुळे शहरात आणखी शंभर पाचशे टपऱ्या उभारणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. त्यामुळे कुणाला काय उखाडायचे ते उखाडून घ्या, असं म्हणत संजय गायकवाड यांनी विरोधकांना थेट इशाराच दिला आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.