AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिमगोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांसाठी गुडन्यूज, होळीसाठी मध्य रेल्वे सोडणार विशेष गाड्या, बुकींग कधीपासून

होळी आणि शिमग्यासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने १८६ विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. मुंबई-सावंतवाडी आणि नागपूर मार्गावरील या गाड्यांचे बुकिंग १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, प्रवाशांनी वेळापत्रक पाहून आपले तिकीट आरक्षित करावे.

शिमगोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांसाठी गुडन्यूज, होळीसाठी मध्य रेल्वे सोडणार विशेष गाड्या, बुकींग कधीपासून
| Updated on: Feb 18, 2026 | 2:45 PM
Share

कोकणचा सर्वात मोठा आणि उत्साहाचा सण म्हणजे होळी आणि शिमगा. या शिमगोत्सवासाठी मुंबईतून गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची दरवर्षी रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळते. दरवर्षीप्रमाणे यंदाही नियमित गाड्यांची तिकिटे फुल्ल झाल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने कंबर कसली आहे. यंदाच्या उत्सवासाठी कोकणासह महाराष्ट्रातील इतर भाग आणि देशभरातील विविध राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने तब्बल १८६ विशेष गाड्या चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई-सावंतवाडी, मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर अशा महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे. तसेच उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठीही विशेष सोय करण्यात आली आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत जाणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन या फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः मुंबई-सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या गाड्यांमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या १८६ गाड्यांचे दोन मुख्य गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. यात होळी विशेष गाड्यांच्या ९४ फेऱ्या असतील. या गाड्या केवळ होळीच्या सणांपुरत्या मर्यादित असतील. तर नियमित विशेष गाड्यांच्या ९४ फेऱ्या असतील. या गाड्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील गर्दी कमी करण्यासाठी नियोजित वेळापत्रकानुसार धावतील.

प्रमुख मार्ग कोणते?

कोकण मार्ग: मुंबई ते सावंतवाडी रोड (थेट सेवा).

विदर्भ मार्ग: मुंबई ते नागपूर आणि पुणे ते नागपूर.

उत्तर भारत: मुंबई/पुणे येथून बनारस, गोरखपूर, समस्तीपूर आणि दानापूर या शहरांसाठी विशेष लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जातील.

सावंतवाडी रोड विशेष गाड्यांचे वेळापत्रक

मुंबई-सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या गाड्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आठवड्यातून दोनदा धावतील. या गाड्यांच्या निश्चित तारखा आणि वेळ रेल्वेच्या अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी आणि कणकवली अशा प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण १८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यावेळी प्रवाशांना आयआरसीटीसी (IRCTC) च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा रेल्वे स्थानकांवरील पीआरएस (PRS) केंद्रांवरून बुकिंग करता येईल. होळीच्या काळात होणारी प्रचंड गर्दी पाहता, प्रवाशांनी १८ तारखेलाच आपले आरक्षण निश्चित करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
Ramraksha Andolan Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात, पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल; शंख नाद अन्...
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेत्यानेच समोर येत सस्पेन्स संपवला!
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत काय घडलं? मातोश्रीवर घडामोडींना वेग
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड