AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपकडून चित्रा वाघ यांना मोठी जबाबदारी, चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

लोकांपर्यंत पोहचविण्याचं काम करू, असा आशावाद चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं.

भाजपकडून चित्रा वाघ यांना मोठी जबाबदारी, चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी चित्रा वाघ यांची निवडImage Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Nov 03, 2022 | 8:11 PM
Share

पुणे : भाजपकडून चित्रा वाघ यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी चित्रा वाघ यांची निवड करण्यात आली. पत्रकार परिषदेमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. सरकार स्थापनेनंतर चित्रा वाघा यांना नेमकं कोणत पदं दिले जाणार, याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. त्यात आता भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी चित्रा वाघ यांना देण्यात आलीय.

संपूर्ण राज्याला चित्रा वाघ यांनी संबंध विकसित केले. संघटन वाढीकरिता प्रयत्न करतील. महिला भाजपत प्रवेश करतील. महाविकास आघाडीतील चांगलं काम करणाऱ्या महिला भाजपात येतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

राजकारणातून सत्ता निर्मिती होते. महिलांची मतं महत्वाची असतात. सरकार सर्वसामान्य व्यक्तीला न्याय देते. लोकशाहीची पद्धत महिलांपर्यंत पोहचली पाहिजे. मतदान करून प्रभाविपणे राज्यात पक्षाची प्रतिमा पोहचविण्याचं काम या माध्यमातून केले जाईल.

यासाठी चित्रा वाघ या काम करतील. राज्यातील महिला अत्याचाराबद्दल त्यांनी आवाज उचलला. राज्यात महिलाशक्ती निर्माण करण्यासाठी चित्रा वाघ यांची निवड करण्यात आली. महिला मोर्चाला प्रचंड ताकद मिळेल. राज्यातील महिला मोर्चा देशातील चांगला असेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चांगल्या परिस्थितीत महिला मोर्चा आहे. उमाताई खापरे यांची जागा ते आता घेतली. जबाबदारी एकत्रितपणे सांभाळू. सत्तेमध्ये आहोत. त्यामुळं मोठी जबाबदारी आहे. महिलांचं पोषणासाठी महिला मोर्चा काम करेल. राज्याचे 50 ते 60 अडीच महिन्यातील निर्णय महिला व बालकांसाठी आहे. ते लोकांपर्यंत पोहचविण्याचं काम करू, असा आशावाद चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.