AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदनगरचं नामांतर करा; भुषणसिंह होळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

भुषणसिंह होळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात अहमदनगरला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, असे म्हटले आहे. त्यामुळे आता यावर मुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल. | Ahmednagar name

अहमदनगरचं नामांतर करा; भुषणसिंह होळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Updated on: Feb 24, 2021 | 12:04 PM
Share

कोल्हापूर: राज्यात सध्या औरंगाबादच्या नामांतराचा (Aurgabad) मुद्दा गाजत असतानाच आणखी एका शहराच्या नामांतराची मागणी करण्यात आली आहे. अहमदनगरचे नामांतर करुन शहराला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी होळकर घराण्याच्या वंशजांनी केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठवण्यात आले आहे. (Change Ahmednagar name demand by Ahilyadevi holkar descendants)

भुषणसिंह होळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात अहमदनगरला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, असे म्हटले आहे. त्यामुळे आता यावर मुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल.

काही दिवसांपूर्वी होळकर घराण्याच्या वंशजांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. वाफगावच्या जागेवरून हा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर लगेचच अहमदनगरच्या नामांतराची मागणी पुढे आल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात अहमदनगरच्या नामांतराचा वाद पेटण्याची शक्यताही जाणकार व्यक्त करत आहेत.

होळकर घराण्याने शरद पवार यांच्यावर काय टीका केली होती?

जेजुरी गडावरील राजमाता अहिल्या देवी यांच्या पुतळ्याचे शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार होते. त्यावरुन निर्माण झालेल्या वादावेळी होळकर घराण्याच्या वंशजांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. जेजुरी गडावरील राजमाता अहिल्या देवी यांच्या पुतळ्यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातून शरद पवार यांच्याकडून राजकारण होत आहे. छत्रपती घराणे सर्व समाजाचे भल्याचा विचार करणारे असल्याने छत्रपती संभाजी राजेंना या कार्यक्रमाला जाऊ नये, अशी विनंती भूषण राजे होळकर यांनी केली होती.

अशा मागण्या होतच असतात: संजय राऊत

संजय राऊत हे बुधवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना अहमदनगरच्या नामांतराच्या मागणीविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा राऊत यांनी अशा मागण्या होतच असतात. पण औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की, असे वक्तव्य केले.

संबंधित बातम्या:

औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की; संजय राऊतांचा ठाम पवित्रा

आता होळकरांच्या वंशजांचीही शरद पवारांवर टीका, छत्रपती संभाजीराजेंनाही पाठवला संदेश

(Change Ahmednagar name demand by Ahilyadevi holkar descendants)

Follow Us
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.