AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा, अखेर नितेश राणेंची ती मागणी मान्य

मोठी बातमी समोर येत आहे, सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे, मंत्री नितेश राणेंच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा, अखेर नितेश राणेंची ती मागणी मान्य
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 24, 2025 | 3:35 PM
Share

राज्य सरकार विविध योजना राबवत आहे, लाडकी बहीण योजना, महिलांना अर्ध्या तिकिटामध्ये एसटी बसने प्रवासाची सुविधा, यासोबत शेतकऱ्यांसाठी देखील अनेक नव्या योजनांची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. यंदा महाराष्ट्राला पावसाचा चांगलाच तडाखा बसला, पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला. शेतातील उभी पिके आडवी झाली, काही ठिकाणी तर पावसाचा एवढा जबरदस्त तडाखा बसला की शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेली. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारे काही दिवसांपूर्वी मोठ्या पॅकेजी घोषणा केली होती.

या पॅकेजअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे, त्यांना नुकसान भरपाई, तसेच ज्यांचं घर पावसामुळे जमीनदोस्त झालं त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून नवं घर, ज्यांच्या शेतातील माती वाहून गेली त्या शेतकऱ्यांना वेगळी मदत, तसेच ज्यांच्या विहिरी पावसामुळे ढासळल्या त्यांना देखील विशेष मदतीची घोषणा, अशी मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या विविध योजना आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिली जात आहे, यासोबत सैर कृषीपंपांवर देखील मोठं अनुदान सरकारच्या वतीनं देण्यात येत आहे. दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे, त्यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे.  आता शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना देखील सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. मंत्री नितेश राणे यांनी यासंदर्भात मागणी केली होती, नितेश राणे यांच्या या मागणीनंतर अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे.

मस्त्य व्यवसायाला कृषी दर्जा दिल्यामुळे ही वीज सवलत लागू करण्यात आली आहे,  मच्छिमार,  मस्त्य संवर्धक, मस्त्य व्यवसायिक, तसेच मस्त्यकास्तकार यांना ही सवलत लागू असणार आहे. मस्त्य व्यवसाय प्रकल्पांनाही कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रकल्पाची एनएफडीबी अंतर्गत नोंदणी आवश्यक असल्याचं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे, या सवलतीमुळे मच्छिमार बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.