AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंनी दिलेलं पुस्तक वाचल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं की उद्धव ठाकरेंनी पुस्तक भेट म्हणून दिलं होतं. ते पुस्तक दिल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया होती जाणून घेऊया...

उद्धव ठाकरेंनी दिलेलं पुस्तक वाचल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया काय?
Uddhav Thackeray and Devendra FadnavisImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 18, 2025 | 5:10 PM
Share

हिंदी सक्ती हवीच कशाला या लेखांचा संग्रह उद्धवजींनी दिल्यामुळे मी अतिशय नीट वाचला. माझी एवढीच मागणी आहे की, जेव्हा हा अहवाल आपल्याला सुपूर्द केला ती पण बातमी लावावी. तो अहवाल स्वीकारल्याच्या बातम्या पेपरला आलेल्या ती पण बातमी त्यात लावावी. मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर त्या संदर्भात अधिकृत पोस्ट आपण केली. त्याची कात्रण आपण लावावी. एवढीच माझी माफक मागणी आहे. त्यापेक्षा जास्त माझी मागणी नाही” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले.

“आपल्याला पुढची भेट घ्यावी लागेलच. नाहीतर यांना खाद्य कसं मिळेल? हे कठीणच झालं जयंतराव, तुम्ही माझ्याकडे येऊन गेले की तुम्ही भाजपमध्ये येणार. हे आमच्याकडे येऊन गेले की हे भाजपसोबत येणार. आपण संवादाच्या गोष्टी करतो, मी माध्यमांना दोष देत नाही. पण माझी विनंती आहे की, कोणी कोणाला भेटले म्हणजे तो त्यांच्या पक्षात चालला आहे, युतीच होतेय असं नसतं” असं देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं.

वाचा: दीड दमडीचा अभिनेता, तुला मराठी येतं का? इंग्रजीमध्ये शिकलास…; रितेश देशमुखवर बिग बॉस फेम रिलस्टारची टीका

नागपूरमधील गुन्हेगारी किती कमी झाली ?

“अनेक आमच्या सदस्यांनी या ठिकाणी गुन्हेगारी वाढली त्याची आकडेवारी सांगितली. अनेक वर्ष गृहविभागाच्या चर्चेला उत्तर देताना नेहमी हे सांगतो गुन्हेगारी संदर्भातील आकडेवारीच विश्लेषण करणं हे संवेदनशील वाटत नाही. तथापी समोरुन आकडेवारी माडंली गेली की आपल्याला आकडेवारी मांडावीच लागते. 2024 ची तुलना केली, तर गुन्हे 11656 ने कमी झाले आहेत. 6.75 टक्क्याने गुन्हे कमी झालेत. मग खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे सगळे गुन्हे कमी झालेले आहेत. सायबर गुन्हे उघड होण्याच प्रमाण वाढलं आहे” अशी माहिती आकडेवारीनिशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं.

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.