AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसने महाराष्ट्राची माफी मागावी, राऊतांना अर्वाच्य बोलताना लाज वाटायला हवी, आमदार फरांदे कडाडल्या

नाशिकमध्ये आज रविवारी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा जिल्हा काँग्रेसने दिला होता. मात्र, पोलिसांनी वाटेतच कार्यकर्त्यांना रोखले. काँग्रेसच्या या आंदोलनाचा आमदार देवयानी फरांदे यांनी जोरदार समाचार घेतला.

काँग्रेसने महाराष्ट्राची माफी मागावी, राऊतांना अर्वाच्य बोलताना लाज वाटायला हवी, आमदार फरांदे कडाडल्या
देवयानी फरांदे, आमदार.
| Edited By: | Updated on: Feb 20, 2022 | 3:50 PM
Share

नाशिकः एकीकडे राज्यात भाजप (BJP) विरुद्ध शिवसेना अशी धुमचक्री रंगलेली पाहायला मिळतेय. दुसरीकडे काँग्रेसने आज नाशिकमध्ये केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्याघरावर मोर्चा नेत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांना पोलिसांनी रस्त्यातच रोखले. या साऱ्यावरून आता भाजपच्या आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande) आक्रमक झाल्यात. त्यांनी काँग्रेसने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केलीय. तर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अर्वाच्य भाषेत बोलताना लाज वाटायला हवी होती, असा टोलाही हाणलाय. येणाऱ्या काळात नाशिक महापालिकेची निवडणूक होतेय. त्या पार्श्वभूमीवर भाजप आक्रमक झालेला दिसतोय.

नेमके प्रकरण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना म्हटले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान देश लॉकडाऊनचे पालन करत होता. मात्र काँग्रेसवाले परिस्थिती बिघडण्याची वाट पहात होते. जागतिक आरोग्य संघटना सांगत होती की, लोकांनी आहे तिथेच थांबावे. परंतु काँग्रेसने तेव्हा महाराष्ट्रातील परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत तिकिटे वाटली जात होती. हे खूप मोठे पाप होते, असा गंभीर आरोप नरेंद्र मोदी यांनी केला होता. या वक्तव्याविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झालाय. महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संपूर्ण राज्यभरात ‘मोदी माफी मागो’ या मागणीसाठी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिलाय. त्यानंतर मुंबई, पुणे, औरंगाबादसह इतर ठिकाणीही अशी आंदोलने झाली. आज रविवारी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा नाशिक जिल्हा काँग्रेसने दिला होता. मात्र, पोलिसांनी वाटेतच कार्यकर्त्यांना रोखले. काँग्रेसच्या या आंदोलनाचा आमदार देवयानी फरांदे यांनी जोरदार समाचार घेतला.

काय म्हणाल्या फरांदे?

काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या धोरणावर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी जोरदार टीका केली. आमदार फरांदे म्हणाल्या की,देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र सरकार यावर नियंत्रण मिळवू शकले नाही. महाविकास आघाडी पूर्णतः अपयशी ठरलीय. त्यामुळे नरेंद्र मोदींनी नाही, तर काँग्रेसनेच महाराष्ट्राचा माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. शिवाय भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर संजय राऊतांनी आज टीका केली. यावर त्या म्हणाल्या की, संजय राऊत यांनी जी अर्वाच्य भाषा वापरली, असे बोलताना त्यांना लाज वाटायला पाहिजे होती, अशी टीकाही त्यांनी केली.

इतर बातम्याः

पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला

‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात

शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.