AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गृहमंत्री म्हणून सांगतो, एकही पाकिस्तानी…’, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात कृपया चुकीच्या बातम्या करु नका. माध्यमांनी १०७ नागरिक हरवले असल्याच्या बातम्या केल्या आहेत. परंतु राज्यातील सर्वच पाकिस्तान नागरिक सापडले आहे.

'गृहमंत्री म्हणून सांगतो, एकही पाकिस्तानी...', देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 27, 2025 | 11:00 AM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याबाबत रविवारी महत्वाचे वक्तव्य केले. तसेच माध्यमांनी यासंदर्भातील बातम्या देताना खबरदारी घेण्याचे सांगितले. पुण्यात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, गृहमंत्री म्हणून सांगतो, पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात कृपया चुकीच्या बातम्या करु नका. माध्यमांनी १०७ नागरिक हरवले असल्याच्या बातम्या केल्या आहेत. परंतु राज्यातील एकही पाकिस्तानी नागरिक हरवले नाही. सर्वच पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. आता एकही पाकिस्तान नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही. आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत सर्वांना पाकिस्तानात पाठवण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

सर्वच फ्लेक्स काढा

राज्यातील शहराशहरांमध्ये करण्यात येत असलेली फ्लेक्सबाजी बंद करायला हवी. फ्लेक्सबाजीवर टाच आणायला हवी. कारण त्यामुळे शहरांचे सौदर्यं खराब होत आहे. कोणाला फ्लेक्स लावायचे असेल तर त्यांनी ते अधिकृत होर्डिंगवर फ्लेक्स लावा. माझे स्वत:चे अनधिकृत फ्लेक्स काढा, असे मी महानगरापालिकांना सांगितले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

एप्रिल- मे महिन्यांत जलसाठे कमीच…

राज्यातील पाणी टंचाई भीषण होत आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, एप्रिल मे महिन्यांत पाणीसाठा कमी असतो. ही परिस्थिती पहिल्यांदा आलेली नाही. दरवर्षी अशी परिस्थिती असते. मागील वर्षीही एप्रिल-मे महिन्यांत ३२ टक्के पाणीसाठा होता. यावर्षी तो ३८ टक्के पाणीसाठा आहे. म्हणजेच मागील वर्षापेक्षा चांगली परिस्थिती आहे. राज्यातील मोठ्या धरणांमध्ये पाणी साठा चांगला आहे. परंतु लहान धरणांमध्ये जलसाठा कमी झाला आहे.

पुणे महापालिकेला 75 वर्ष पूर्ण झाली आहे. त्याबद्दल पुणे अर्बन डायलॉग हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. जे काही आव्हाने आहेत, त्यावर या माध्यमातून चर्चा होणार आहे. हा अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मनपाच्या उपक्रमाचे कौतूक केले.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय