AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांनी जगायची की मरायचं; 30 गावातील शेतीची वीज तोडली…

शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळाला नसल्यामुले शेतकरी वर्ग चिंतेत आहे. त्यातच वीज महावितरण कंपनींकडून वीज कनेक्शन तोडल्यामुळे येथील कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला होता.

शेतकऱ्यांनी जगायची की मरायचं; 30 गावातील शेतीची वीज तोडली...
| Updated on: Mar 11, 2023 | 11:17 PM
Share

अहमदनगर : ऐन रब्बी हंगामत एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर नांगर फिरवला आहे .तर दुसरीकडे मात्र वीज महावितरण कंपन्यांनी वीज तोडून शेतकऱ्यांना दुसरा धक्का दिला आहे. त्यामुळे आता शेतकरीवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील सुमारे 30 गावांची शेतीची वीज कनेक्शन तोडल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

आधीच कांद्याच्या बाजारभावामुळे शेतकरी प्रचंड वैतागलेला आहे. त्या शेतकऱ्याला आता उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच वीज वितरण कंपनीने झटका दिला आहे.

यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांनी आक्रमक भूमिका घेत वीज वितरणचा निषेध व्यक्त करत कार्यालयाला टाळे ठोकले होते.

अखेर तीन तासानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन पूर्ववत करण्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील या प्रकारामुळे कांदा उत्पादक आणि भाजीपाला, रब्बी हंगामातील पीक धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेतीची वीज कनेक्शन तोडल्यामुळे शेतीला पाणी द्यायचे कसे असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.

अहमदनगर, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळाला नसल्यामुले शेतकरी वर्ग चिंतेत आहे. त्यातच वीज महावितरण कंपनींकडून वीज कनेक्शन तोडल्यामुळे येथील कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला होता.

वीज महावितरण कंपनीकडून वीज कनेक्शन तोडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस  प्रताप ढाकणे यांच्याकडून आंदोलन करत वीज वितरणच्या कार्यालयालाच टाळे ठोकण्यात आले. त्यानंतर वीज महावितरण कंपनीनेही आंदोलकांमुळे माघार घेत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे अश्वासन दिले आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.