AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज मिळणार, 9000 मे. वॅट सौरऊर्जा योजनेचा करार

सौर ऊर्जेद्वारे शेती पंप चालविण्याची ही योजना 2016 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम साकारली होती. पहिला पायलट प्रकल्प अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धी येथे साकारला होता. त्याकाळी 2000 मे. वॅट सौर ऊर्जा तयार झाली होती.

शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज मिळणार, 9000 मे. वॅट सौरऊर्जा योजनेचा करार
| Updated on: Mar 07, 2024 | 2:46 PM
Share

मुंबई | 7 मार्च 2024 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसाची वीज मिळणार आहे. त्यामुळे रात्रीअपरात्री शेतीचे पंप सुरु ठेवण्यासाठीचा खटाटोप संपणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा थ्री फेज वीज मिळत नाही. त्यामुळे त्यांना रात्रीच्या वेळी शेतीला पाणी पुरवठा करावा लागतो. रात्रीच्या वेळी शेताकडे जाताना बिबटे अन्य जनावरांकडून शेतकऱ्यांवर हल्ला होण्याच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. यामुळे दिवसाचा संपूर्ण क्षमतेने वीज पुरवठा करण्याची मागणी होत आहे. अशात आता सरकारने राज्यातील कृषी क्षेत्रासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवसाचा देखील वीज पुरवठा पुरेशा क्षमतेने होणे शक्य होणार आहे. मुख्यमंत्री सौर कुषी वाहीनी योजना 2.0 सुरु करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हुडको सोबत करार करण्यात आला.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. राज्यात लोडशेडींग आणि इतर कारणाने दिवसाचा वीज पुरवठा होत नाही. त्यामुळे शेतीला पाणी देण्यासाठी रात्रीच्यावेळी शेतकऱ्यांना पाणी सोडण्यासाठी पंप सुरु करावे लागतात, त्यामुळे अनेकदा अपघात तसेच जंगली पशूपासून हल्ले देखील होत असतात, परंतू आज शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी 9000 मे.वॅटच्या कामाचे देकार पत्र जारी करण्यात आले. मुख्यमंत्री सौर कृषि वाहीनी योजना 2.0 अंतर्गत 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.

25,000 रोजगार निर्मिती

राज्यात दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषि वाहीनी योजना 2.0 योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत 40 हजार कोटीची गुंतवणूक होऊन 25000 रोजगारांची निर्मिती होणार आहे. तसेच साल 2025 मध्ये 40% कृषी फिडर सौर ऊर्जेवर येणार आहेत. 18 महिन्यात प्रकल्प पूर्ण करायचा आहे. पण सोबत काम केले तर 15 महिन्यात देखील काम पूर्ण होईल असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना या योजनेत 1.25 लाख रुपये प्रति हेक्टर वार्षिक भाडे मिळणार आहे. उद्यापासून उर्वरित कृषि फिडर सौर ऊर्जेवर कसे येतील, याचे नियोजन सुरू करा, आता थांबू नका असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. शेतकऱ्यांना 8 लाख सौर ऊर्जा पंप सुद्धा द्यायचे आहेत असे त्यांनी सांगितले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.