AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंदूक सोडून पुस्तकांची धरली साथ, राजुला आता झाली बारावी उत्तीर्ण, त्यासाठी करावा लागला संघर्ष

राजुला ही जहाल नक्षली होती. आता ती बारावीचे परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनी झाली. राजुला हिदमीच्या संघर्षाची ही अनोखी कहाणी आहे. बंदुकीपासून पुस्तकांपर्यंतचा राजुलाचा हा प्रवास जाणून घेऊया.

बंदूक सोडून पुस्तकांची धरली साथ, राजुला आता झाली बारावी उत्तीर्ण, त्यासाठी करावा लागला संघर्ष
| Updated on: May 27, 2023 | 3:45 PM
Share

शाहिद पठाण, प्रतिनिधी, गोंदिया : बारावीचा निकाल लागला. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. मात्र या यशात आदिवासी समाजातील राजुला हिदामी हिचीही भर पडली. अनेकांना ९० च्यावर गुण मिळाले. राजुलाला 45.83% गुण मिळाले. तुम्ही म्हणाल यात काय विशेष. पण 45 टक्के गुण घेणाऱ्या राजुलाची दखल घेण्याचे कारण काही वेगळेचं आहे. राजुला ही जहाल नक्षली होती. आता ती बारावीचे परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनी झाली. राजुला हिदमीच्या संघर्षाची ही अनोखी कहाणी आहे. बंदुकीपासून पुस्तकांपर्यंतचा राजुलाचा हा प्रवास जाणून घेऊया.

राजुला मूळची गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील. अतिदुर्गम नक्षलग्रस्त भाग असलेल्या लवारी या गावातली रहिवासी. नक्षलवाद्यांनी तिला जबरदस्तीने पळवून नेले होते. तेव्हा ती पंधरा वर्षाची होती. नक्षली चळवळीमध्ये तिला सहभाग घ्यावा लागला. एवढ्या कमी वयात तिच्यावर सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली.

RAJULA 2 N

जहाल नक्षलवादी म्हणून कार्यरत

राजुला त्या काळात गोंदिया आणि गडचिरोली परिसरातील जहाल नक्षलवादी म्हणून कार्यरत होती. अनेक प्रकरणात पोलिसांवर गोळीबार करणे, लूटमार करणे अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद तिच्या नावावर होती. परंतु हिंसाचाराने भरलेल्या या जीवनात तिने स्वतःला दूर सारत ती पुढे गेली.

सातवीनंतर सोडली होती शाळा

तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्यासमोर तिने आत्मसमर्पण करून शिक्षणाची कास धरली. नक्षली चळवळीत असताना तिचे सातवीपर्यंत शिक्षण झाले होते. आत्मसमर्पण केल्यानंतर तिने 2018 ला 8 वीपासून आपले शिक्षण सुरू ठेवले. 2021 मध्ये दहावी आणि आता 2023 ला बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले.

संदीप आटोळे यांनी स्वीकारले पालकत्व

यात पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांनी तिचे पालकत्व स्वीकारले. तिच्या शिक्षणाचा सगळा भार उचलला. त्यांच्या पाठिंबामुळेच आज राजुला हिदामी ही पास झाली. संदीप आटोळे यांनी राजुलाला शिक्षणाच्या प्रवाहात आणले. आज राजुला सर्वसामान्य मुलीसारखी आयुष्य जगत आहे. अशी माहिती गोंदियाचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिली.

राजुलाच शिक्षण गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे शासकीय आदिवासी वसतिगृहात राहून झाले. तिने आपले शिक्षण आठवी ते बारावी पूर्ण केले आहे. एवढेच नाही तर पुढे तिला पोलीस सेवेत कार्य करण्याची इच्छा आहे. ती पोलीस दलाचे भरतीपूर्व प्रशिक्षण घेत आहे. भविष्यात पुढील शिक्षण घेऊन पोलीस सेवेत दाखल होण्याचा तिचा मानस आहे.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.