AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील ‘या’ 8 गावांच्या नागरिकांचा थेट मतदानावर बहिष्काराचा इशारा, नेमकं प्रकरण काय?

आमगाव नगर परिषदेचा प्रश्न प्रलंबित असल्याने अनेक नागरिकांची कामे होत नसल्याने आणि अनेक योजनांपासून नागरिक वंचित राहत असल्याने येथील 8 गावातील नागरिकांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील 'या' 8 गावांच्या नागरिकांचा थेट मतदानावर बहिष्काराचा इशारा, नेमकं प्रकरण काय?
lok sabha election schedule 2024Image Credit source: Instagram
| Edited By: Chetan Patil | Updated on: Apr 03, 2024 | 4:34 PM
Share

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. या लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या 19 एप्रिलला होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्षांचा जोरदार प्रचारही सुरु झाला आहे. असं असताना महाराष्ट्रातील 8 गावांच्या गावकऱ्यांनी थेट मतदानावर बिहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगरपरिषदेचा गेल्या 10 वर्षांपासून प्रश्न प्रलंबित आहे. याबाबत राज्य शासनातर्फे सुप्रीम कोर्टामध्ये याचिका सादर करण्यात आली आहे. पण या याचिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून निर्णय लागत नसल्याने आमगाव येथील नागरिकांनी आमगाव नगर संघर्ष समिती स्थापन करून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. या बहिष्काराच्या निर्णयावर आज आमगाव येथील तहसील कार्यालयामध्ये सभा घेण्यात आली.

आमगाव नगर परिषदेचा प्रश्न प्रलंबित असल्याने अनेक नागरिकांची कामे होत नसल्याने आणि अनेक योजनांपासून नागरिक वंचित राहत असल्याने येथील 8 गावातील नागरिकांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या निर्णय घेतला आहे. त्याच अनुषंगाने आज तहसील कार्यालय येथे सभा घेण्यात आली. नागरिकांनी बहिष्कार करू नये. सर्वसामान्यांचा हक्क आहे. मतदान बजावण्याचा याबाबत आपण हक्क बजावून लोकशाहीला बळकट करण्याचे आवाहन यावेळी प्रशासनातर्फे करण्यात आलेला आहे.

काही नागरिकांचा बहिष्कारास विरोध

एका बाजूला आमगाव नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या 8 गावातील नागरीक हे बहिष्कार करण्यातच्या बेतात आहेत. मात्र स्थानिक पातळीवर अनेक पक्षांचे समर्थक याला विरोध दर्शवित असल्याचं दिसून आलं आहे. कारण हा प्रश्न राज्य शासनाच्या संबंधित आहे. जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळेस आपण सर्व मिळून बहिष्कार टाकू, अशी भूमिका काहींनी मांडली आहे. त्यामुळे आता याबाबत कोणता निर्णय प्रशासन लावतो आणि नागरिक निर्णय घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तर पोलीस प्रशासनाने हेतू पुरस्कर नागरिकांना मतदानापासून वंचित केल्यास योग्य कारवाई करणार असल्याचे फक्त निर्देश दिले आहेत. आता या आठ गावातील नागरीक काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC | तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन् फुल-घास चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?