AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मुख्यमंत्र्यांना समुद्रात उचलून टाकू’, बच्चू कडू यांचा मोठा इशारा, नेमकं काय म्हणाले?

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा इशारा दिला आहे. "आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती करु, मुख्यमंत्र्यांना उचलून समुद्रात टाकू", असं वक्तव्य बच्चू कडू यांनी आपल्या भाषणात केलं आहे.

'मुख्यमंत्र्यांना समुद्रात उचलून टाकू', बच्चू कडू यांचा मोठा इशारा, नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडू यांचा मोठा इशारा
| Updated on: Aug 05, 2024 | 6:13 PM
Share

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच थेट इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांचा गणपती करु. मुख्यमंत्र्यांना समुद्रात उचलून टाकू, असा मोठा इशारा बच्चू कडू यांनी दिला. दिव्यांगांच्या आणि कामगारांच्या योजनांवरुन बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समुद्रात टाकण्याचा इशारा दिला. “आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती करु. त्यांना उचलून समुद्रात टाकू. त्यासाठी तुमची साथ पाहिजे आणि आशीर्वाद पाहिजेत”, असं बच्चू कडू म्हणाले. ते हिंगोलीत एका कार्यक्रमात बोलत होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांना समुद्रात टाकण्याची भाषा करणाऱ्या बच्चू कडू यांनीच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताना लाडके मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला होता.

बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

“आम्ही सर्वसामान्यांसाठी काम करतोय. अजूनही तुम्हाला आमच्याकडून कामे करून घ्यायचे असतील तर प्रहारचे सर्वाधिक जास्त आमदार विधानसभेत पाठवा. आम्ही मुख्यमंत्र्याचा ही गणपती बनवू आणि समुद्राच्या पाण्यात टाकू”, अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी केलीय. कळमनुरी येथील शेतकरी मेळाव्यात बच्चू कडू बोलत होते.

बच्चू कडू यांचा सरकारला टोला

“कलेक्टरला घेऊन जाणाऱ्या चालकाला 45 हजार पगार, इकडे एसटीचा चालक 50 – 50 जण घेऊन जातोय. त्याला मात्र केवळ 12 हजार पगार आहे. हे तर फार चुकीचं आहे. यह नहीं चलेगा साहब, इधर बच्चू कडू अभी जिंदा है”, असा टोला बच्चू कडू यांनी सरकारला लगावला.

बच्चू कडू आणखी काय म्हणाले?

आगामी विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कळमनुरी येथे आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी आणि कार्यकर्ता मेळावा सपन्न झाला. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. मागण्या मान्य केल्या तर आम्ही लढणार नाहीत. नाही केल्या तर लढू. आम्ही 25 जणांची चाचपणी करायला सुरुवात केली आहे. आम्ही दोन जागा जाहीरही केल्या आहेत, असं बच्चू कडू यांनी यावेळी सांगितलं.

“आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे 9 तारखेला लाखोंच्या उपस्थितीत मोर्चा काढणार आहोत. आमची तिसरी आघाडी नाही. आमची शेतकरी, शेत मंजुरांची आघाडी आहे. जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही लढणार नाहीत. मग आमची गरज काय? मागण्या मान्य केल्या तर आम्ही निवडणुका लढवणार नाहीत, नाही केल्या तर लढू. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्या. दोन वर्ष मुदद्लमध्ये आणि व्याजात सवलत द्यावी. पेरणी ते कापनीपर्यंत सगळी कामे MRGS मधून व्हावी. सगळी काम करणारे घटक आहेत. या सगळ्यांसाठी योजना प्रॉपर आणावी. पैसे नसतील तर 40 एकरमधील राज्यपालांचा बंगला विकावा. 40 एकरमध्ये राज्यपालाच्या बंगल्याची गरज नाही. ते विकून 1 लाख कोटी मिळतील”, असं बच्चू कडू म्हणाले.

अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.