AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मुख्यमंत्र्यांना समुद्रात उचलून टाकू’, बच्चू कडू यांचा मोठा इशारा, नेमकं काय म्हणाले?

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा इशारा दिला आहे. "आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती करु, मुख्यमंत्र्यांना उचलून समुद्रात टाकू", असं वक्तव्य बच्चू कडू यांनी आपल्या भाषणात केलं आहे.

'मुख्यमंत्र्यांना समुद्रात उचलून टाकू', बच्चू कडू यांचा मोठा इशारा, नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडू यांचा मोठा इशारा
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Aug 05, 2024 | 6:13 PM
Share

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच थेट इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांचा गणपती करु. मुख्यमंत्र्यांना समुद्रात उचलून टाकू, असा मोठा इशारा बच्चू कडू यांनी दिला. दिव्यांगांच्या आणि कामगारांच्या योजनांवरुन बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समुद्रात टाकण्याचा इशारा दिला. “आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती करु. त्यांना उचलून समुद्रात टाकू. त्यासाठी तुमची साथ पाहिजे आणि आशीर्वाद पाहिजेत”, असं बच्चू कडू म्हणाले. ते हिंगोलीत एका कार्यक्रमात बोलत होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांना समुद्रात टाकण्याची भाषा करणाऱ्या बच्चू कडू यांनीच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताना लाडके मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला होता.

बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

“आम्ही सर्वसामान्यांसाठी काम करतोय. अजूनही तुम्हाला आमच्याकडून कामे करून घ्यायचे असतील तर प्रहारचे सर्वाधिक जास्त आमदार विधानसभेत पाठवा. आम्ही मुख्यमंत्र्याचा ही गणपती बनवू आणि समुद्राच्या पाण्यात टाकू”, अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी केलीय. कळमनुरी येथील शेतकरी मेळाव्यात बच्चू कडू बोलत होते.

बच्चू कडू यांचा सरकारला टोला

“कलेक्टरला घेऊन जाणाऱ्या चालकाला 45 हजार पगार, इकडे एसटीचा चालक 50 – 50 जण घेऊन जातोय. त्याला मात्र केवळ 12 हजार पगार आहे. हे तर फार चुकीचं आहे. यह नहीं चलेगा साहब, इधर बच्चू कडू अभी जिंदा है”, असा टोला बच्चू कडू यांनी सरकारला लगावला.

बच्चू कडू आणखी काय म्हणाले?

आगामी विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कळमनुरी येथे आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी आणि कार्यकर्ता मेळावा सपन्न झाला. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. मागण्या मान्य केल्या तर आम्ही लढणार नाहीत. नाही केल्या तर लढू. आम्ही 25 जणांची चाचपणी करायला सुरुवात केली आहे. आम्ही दोन जागा जाहीरही केल्या आहेत, असं बच्चू कडू यांनी यावेळी सांगितलं.

“आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे 9 तारखेला लाखोंच्या उपस्थितीत मोर्चा काढणार आहोत. आमची तिसरी आघाडी नाही. आमची शेतकरी, शेत मंजुरांची आघाडी आहे. जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही लढणार नाहीत. मग आमची गरज काय? मागण्या मान्य केल्या तर आम्ही निवडणुका लढवणार नाहीत, नाही केल्या तर लढू. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्या. दोन वर्ष मुदद्लमध्ये आणि व्याजात सवलत द्यावी. पेरणी ते कापनीपर्यंत सगळी कामे MRGS मधून व्हावी. सगळी काम करणारे घटक आहेत. या सगळ्यांसाठी योजना प्रॉपर आणावी. पैसे नसतील तर 40 एकरमधील राज्यपालांचा बंगला विकावा. 40 एकरमध्ये राज्यपालाच्या बंगल्याची गरज नाही. ते विकून 1 लाख कोटी मिळतील”, असं बच्चू कडू म्हणाले.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं