AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : हिंगोलीत 40 शेतकरी रात्री पुरात अडकले; जनावरांच्या गळ्यापर्यंत पाणी, मराठवाड्यात महापूर

Hingoli Flood : मराठवाड्यात महापूर आलाय. सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. हिंगोलीत 40 शेतकरी रात्री पुरात अडकले आहेत. जनावरांच्या गळ्यापर्यंत पाणी आलं आहे. लोकांची घरं पाण्याखाली गेलीत. तर जनावरं पाण्यात उभी असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. वाचा सविस्तर...

Video : हिंगोलीत 40 शेतकरी रात्री पुरात अडकले; जनावरांच्या गळ्यापर्यंत पाणी, मराठवाड्यात महापूर
हिंगोलीत पूरImage Credit source: tv9
| Updated on: Sep 02, 2024 | 10:20 AM
Share

जो मराठवाडा कायम दुष्काळाच्या झळा सोसतो तो मराठवाडा आज पुराच्या पाण्यात अडकलाय. हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस होतोय. या पावसामुळे नद्यांना पूर आलाय. गावं पाण्याखाली गेली आहेत. 40 शेतकरी रात्री पुरात अडकले आहेत. कळमनुरी तालुक्यातील देवजना गावात काही शेतकरी पुराच्या पाण्यात अडकले आहेत. कालपासूनच या भागात जोरदार पाऊस कोसळतोय. ठिकठिकाणी पाणी साचलंय. तर काही गावांमध्येदेखील हे पाणी शिरलं आहे. काल रात्रीपासून देवजना गाव पाण्याखाली आहे. 40 शेतकरी पुराच्या पाण्यात अडकून पडलेत.

हिंगोली जिल्ह्यात पूर, 40 जण अडकले

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील देवजना या गावात पुराचं पाणी शिरलं आहे. यात 40 शेतकरी अडकलेत. रात्रीपासूनच पाण्याची पातळी वाढत आहे. लोकांची घरं पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे घराच्या छतावर जात नागरिकांनी बचाव केलाय. मात्र जनावरं घराच्या खालीच आहेत. जनावरं रात्रभर पाण्यात उभी आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. आम्हाला या पूराच्या पाण्यातून बाहेर काढाच पण आमची जनावरं देखील वाचली पाहिजेत. त्यांनाही सुरक्षित ठिकाणी नेलं पाहिजे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी टीव्ही 9 मराठीवर याबाबतची प्रतिक्रिया दिली. दोन दिवस हिंगोलीत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पूर आल्याची परिस्थिती आहे. काही गावांमध्ये पाणी शिरलं आहे. काही ठिकाणी अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं गेलं आहे. देवजना गावातील लोकांनाही बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं गोयल म्हणाले. तर जनावरांना बाहेरबाबत प्रशासनाच्या काय हालचाली सुरु आहेत? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा आधी लोकांना या ठिकाणाहून बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मग जणावरांबाबत आम्ही निर्णय घेऊ, असं अभिनव गोयल म्हणाले.

छत्रपती संभाजीनगरमध्येही मुसळधार पाऊस

तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दहेगाव बंगला या गावात पुराचं घुसलं आहे. पावसाचं पाणी गावातील अनेक घरांमध्ये घुसलं आहे. पावसाचे पाणी शाळा जिम वाचनालयातही पावसाचं पाणी घुसलंय. पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे गावातल्या घरांमध्ये पाणी घुसलं आहे. दहेगाव बंगला या गावातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे नागरिक हैराण झालेत.

Follow Us
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.
भोंदूबाबाकडे गेलेल्या मंत्र्यांना सहआरोपी करा, संजय राऊत यांची मागणी
भोंदूबाबाकडे गेलेल्या मंत्र्यांना सहआरोपी करा, संजय राऊत यांची मागणी.
रुपाली चाकणकर यांनी एक वर्षांपूर्वी खरातला वाचवले- रुपाली ठोंबरे पाटील
रुपाली चाकणकर यांनी एक वर्षांपूर्वी खरातला वाचवले- रुपाली ठोंबरे पाटील.
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?.
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर.
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण.
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त.