AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती संभाजीराजेंवर 100 वर जी नाटकं लिहिली ती काय मुस्लमानांनी लिहिली?: ‘या’ इतिहासकारांनी वाद घालणाऱ्यांनाच केला खडा सवाल…

मराठीतील ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांनीही बदनामी करणारी विशेषणंच संभाजीराजे यांना लावली आहेत. त्यामुळे संभाजीमहाराज यांची बदनामी करणारे कोणी मुस्लमान होते का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

छत्रपती संभाजीराजेंवर 100 वर जी नाटकं लिहिली ती काय मुस्लमानांनी लिहिली?: 'या' इतिहासकारांनी वाद घालणाऱ्यांनाच केला खडा सवाल...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jan 02, 2023 | 7:44 PM
Share

कोल्हापूरः राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणावरून आता राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असा दावा अजित पवार यांनी केला. त्यानंतर भाजपसह शिंदे गटातील काही नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. याविषयावर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी इतिहास आणि बखर वाङ्मयातील दाखले देत संभाजीराजे यांना धर्मवीर म्हणायचे की नाही आणि त्यांना धर्मवीर ही पदवी नेमकी कशी मिळाली यावर त्यांनी संदर्भ देत इतिहासातील दाखले दिले आहेत.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजीराजे यांना धर्मवीर न म्हणता त्यांना स्वराज्यरक्षक असा उल्लेख केल्यानंतर राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.

त्यावर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी बोलताना इतिहासातील बखरकारांनी मांडलेला इतिहास आणि इतिहासात छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी केलेल्या बदनामीचे कसे षडयंत्र रचले गेले तेही त्यांनी बखर, नाटकांचा संदर्भ देत सांगितले.

छत्रपती संभाजीराजे यांनी शिवछत्रपती ही त्यांनी लावून घेतलेली पदवी होती. शिवाजी महाराजांना एका धर्माचे रक्षक म्हणून पुढं आणणे चुकीचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. संभाजीराजे हे धर्मवीर होते, मात्र त्यांना कोणता धर्म अपेक्षित होता हे माहिती करून घेणेही महत्वाचे आहे.

इतिहासातील समकालीन साधनातून मराठाधर्म, महाराष्ट्रधर्म हा अपेक्षित होता. त्यामुळे महाराष्ट्र धर्माबरोबर हिंदू धर्म नव्हता असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कारण त्याकाळी मिर्जाराजा जयसिंगसारख्या हिंदू राजानेही त्याकाळी स्वराज्यावर चालून आलेले अनेक हिंदू राजे होते.

त्यामुळे एका धर्मासाठी संभाजीराजे यांना पुढं आणणं चुकीचं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. जेधे शेखावली, महाराष्ट्र धर्मासाठी एकत्र येण्यासाठी आवाहन केले होते.

छत्रपती संभाजीराजे यांना बदनामी करणारे विशिष्ट केंद्र आहेत. त्यांच्याकडूनच ही बदनामी सुरू झाली आहे असा जोरदार हल्लाबोल इंद्रजीत सावंत यांनी केला आहे.

अण्णाजी दत्तो, विनायक दामोदर सावरकर, गोळवळकर यांनी आपल्या साहित्यातून अपमानस्पद आणि बदनामी करणारी विशेषणं लावली आहेत.

मराठीतील ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांनीही बदनामी करणारी विशेषणंच संभाजीराजे यांना लावली आहेत. त्यामुळे संभाजीमहाराज यांची बदनामी करणारे कोणी मुस्लमान होते का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

इतिहाससंशोधक वा. सी. बेंद्रे, डॉ. कमल गोखले, डॉ. जयसिंगराव पवार यांनी संशोधन करून छत्रपती संभाजीराजे यांची व्यक्तिमत्व तळपत्या तलवारीच्या पात्यासारखं होतं असं चित्र या इतिहासकारांनी संशोधनाच्या माध्यमातून उभी केली आहेत.

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक