AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 पेक्षा जास्त दिवस जेलमध्ये काढले, माझा गुन्हा काय?, संजय राऊत यांचा सवाल

तुरुंग हा तुरुंग असतो. मग तो आर्थर रोडचा असो की, अंदमानचा असो.

100 पेक्षा जास्त दिवस जेलमध्ये काढले, माझा गुन्हा काय?, संजय राऊत यांचा सवाल
संजय राऊत यांचा सवाल Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Nov 09, 2022 | 10:23 PM
Share

मुंबई : संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर त्यांनी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी ते बोलत होतो. संजय राऊथ म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणा अटक करते. आम्ही कायदेशीर लढाई लढलो. आम्ही कधीही चुकीचं काम केलं नाही. एक दुसऱ्यांसोबत राजनैतिक मदभेद होतात. होत राहतील. मी शंभरपेक्षा जास्त दिवस जेलमध्ये काढले. हे मी कधी विसरणार नाही. माझी कुणाही विरोधात तक्रार नाही. देशातील न्यायव्यवस्थेनं न्याय दिला आहे. न्यायव्यवस्थेचा मी आभारी आहे.

मी शंभर दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात होतो. तुरुंग हा तुरुंग असतो. मग तो आर्थर रोडचा असो की, अंदमानचा असो. शंभर पेक्षा जास्त दिवस जेलमध्ये काढले. माझा गुन्हा काय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. मला जेलमध्ये का पाठविलं अजूनतरी मला माहीत नाही, असंही ते म्हणाले.

40 वर्षांपेक्षा जास्त काळ पत्रकारितेत आहे. 30 वर्षांपासून सामनासारख्या महत्त्वाच्या दैनिकाचा संपादक आहे. चार वेळा राज्यसभेचा खासदार झालो. 18 वर्षे खासदार आहे. अशा व्यक्तीला आपण तुरुंगात ढकलता का. शेवटी न्यायालयानं सत्ते समोर आणलं. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. आज तो विश्वास वाढलेला आहे. मी पक्ष सोडून जाणार नाही. मरेन पण पक्ष सोडणार नाही, असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

त्यानंतर संजय राऊत हे शिवाजी पार्कवर दाखल झाले आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन ते बाळासाहेबांचा आशीर्वाद घेणार आहेत. ढोल ताश्याच्या गजरात संजय राऊथ यांचं स्वागत करण्यात आलं. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं.संजय राऊत यांना हात उंचावून त्यांचं अभिवादन स्वीकारलं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.