AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हातभट्टीवर कारवाई होत नसेल तर तिला सरकारी मान्यता द्या, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सरकारला सल्ला

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विषारी दारुकांड प्रकरणात सरकारला सल्ला दिला आहे. हातभट्टीच्या दारुवर कारवाई करता येत नसेल तर सरकारने तिला मान्यता द्यावी असे त्यांनी म्हटले आहे.

हातभट्टीवर कारवाई होत नसेल तर तिला सरकारी मान्यता द्या, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सरकारला सल्ला
ramdas athawale
| Updated on: May 30, 2026 | 6:39 PM
Share

राज्यात पुणे येथील फुगेवाडी आणि हडपसर येथील विषारी दारुकांडातील मृत्यूचा आकडा १८ वर गेल्यानंतर सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात दर काही वर्षांनी देशात हातभट्टी वा गावठी दारु प्यायल्याने अनेकांचे प्राण जात असतात. आता या प्रकरणात देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हातभट्टी दारूच्या विरोधात कडक कारवाई करता येत नसेल तर हातभट्टी दारूला शासनाने परवानगी द्यावी,ज्यामुळे तिच्यावर नियंत्रण ठेवता येईल,असा सल्ला सरकारला दिला आहे.

पुणे येथील पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडी आणि हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विषारी दारुमुळे झालेल्या मृतांचा आकडा हा आता १८ वर गेला आहे. या प्रकरणात अनेक अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाने देखील कारवाई केली आहे.

हातभट्टीच्या दारूच्या विरोधात कडक कारवाई करावी आणि जर हातभट्टीवर कारवाई करता येत नसेल तर या हातभट्टी दारूला शासनानेच परवानगी द्यावी,ज्यामुळे हातभट्टी दारुवर सरकारला नियंत्रण ठेवता येईल,असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सरकारला दिला आहे.

पुण्यात विषारी दारु प्यायल्याने १८ जणांचा मृत्यू झाला आहे, यावरून रामदास आठवले म्हणाले की हातभट्टी दारुवर कारवाई करता येत नसेल तर या हातभट्टी दारुला सरकारने मान्यता द्यावी म्हणजे सरकारला तिच्यावर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल असा सल्ला आठवले यांनी सरकारला दिला आहे. पुण्यातील सर्व अवैध हातभट्टी दारू अड्डे बंद करावेत,पण दुसरीकडे हातभट्टीची दारू कितीही वेळा बंद केली तरी ती स्वस्त मिळत असल्याने पिणारे हातभट्टीची दारू पितात,  त्यामुळे ती बंद केली पाहिजे. नसेल तर मग सरकारने आता हातभट्टीला परवानगी देऊन त्याच्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे. सांगलीच्या जत येथे एका कार्यक्रमाला आले असताना आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपले मत मांडले आहे.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा