AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Forecast : पुढील 48 तास अत्यंत धोक्याचे, गरज असेल तरच बाहेर पडा, अनेक राज्यांना हाय अलर्ट, महाराष्ट्रावरही मोठं संकट

अनेक राज्यांना अवकाळी पाऊस झोडपून काढणार आहे. हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Weather Forecast : पुढील 48 तास अत्यंत धोक्याचे, गरज असेल तरच बाहेर पडा, अनेक राज्यांना हाय अलर्ट, महाराष्ट्रावरही मोठं संकट
IMD Weather Forecast Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 17, 2026 | 10:01 PM
Share

देशासह राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पाऊस चांगलाच झोडपून काढणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस 18 मार्च ते 21 मार्च पर्यंत अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग( IMD) कडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पूर्व आणि मध्य भारतामध्ये पुढील चार दिवस 18, 19, 20 आणि 21 मार्चपर्यंत वादळी वारा, विजांच्या कडकडाट मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्किम, छत्तीसगड या राज्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला असून, वाऱ्याचा वेग देखील ताशी 50-70 किमी प्रतितास एवढा प्रचंड राहणार आहे.

दक्षिण भारताला इशारा

दरम्यान हवामान विभागाकडून दक्षिण भारतामध्ये देखील मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार दक्षिण भारतामध्ये केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि इतर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

उत्तर पश्चिम भारत

उत्तर पश्चिम भारताला देखील अवकाळी पाऊस चांगलाच झोडपून काढणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर पश्चिम भारताला हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

दरम्यान महाराष्ट्रात देखील हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेष: मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सोलापूर, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 30-40 कीमी इतका असू शकतो, असं हवामान विभागानं म्हटलं असून, या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!