AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

El Nino : एल निनोचा राक्षस पावसाला गिळून घेणार, IMD चा चिंता वाढवणारा नवा अंदाज आला!

डॉ. महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार एल निनोचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आयएमडीने याआधीच राज्यांना तसेच केंद्र सरकारला काय काळजी घ्यायला हवी, हे अगोदरच सांगितलेले आहे.

El Nino : एल निनोचा राक्षस पावसाला गिळून घेणार, IMD चा चिंता वाढवणारा नवा अंदाज आला!
el nino effectImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 15, 2026 | 3:49 PM
Share

El Nino Prediction : देशावर सध्या एल निनोचं महासंकट आहे. या एल निनोमुळेच देशात मान्सून उशिराने दाखल झाला. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातही उशिराने मान्सून दाखल झाला. अजूनही मोसमी पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाही. म्हणूनच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. कोणतीही घई न करता चांगल्या पावसाची वाट पाहावी, असे सरकारकडून सांगितले जात आहे. सोबतच दुबार पेरणीचे संकट टाळायचे असेल तर राज्य सरकारकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, असेही आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, आता एली निनोच्या महासंकटाविषयी नवा आणि चिंता वाढवणारा अंदाज समोर आला आहे. आयएमडीच्या प्रमुखानीच याविषयी सविस्तर सांगितले आहे.

एल निनोचा प्रभाव मान्सूननंतरही कायम

एल निनो या जून महिन्याच्या सुरुवातील प्रशांत महासागरात सक्रिय झाला आहे. नव्या अंदाजानुसार आता एल निनोचा प्रभाव सप्टेंबर महिन्यानंतर जास्त वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यावेळी एल निनोचा प्रभाव मान्सूननंतरही कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाचे प्रमुख डॉ. मृत्यूंजय महापात्र यांनी याविषयी माहिती दिली आहे. सोबतच नागरिकांनी घाबरून जाऊ नये. एल निनोच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी शासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

जेव्हा-जेव्हा गरज असेल तेव्हा-तेव्हा हवामान…

डॉ. महापात्र यांच्या मतानुसार जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या सुरुवातीच्या काही दिवसात एल निनोचा प्रभाव मध्यम स्वरुपाचा राहील. त्यानंतर एल निनोचा प्रभाव वाढत जाईल. हवामान विभागाचे याकडे पूर्ण लक्ष आहे. सोबतच जेव्हा-जेव्हा गरज असेल तेव्हा-तेव्हा हवामान विभागाकडून शेतकरी तसेच सामान्यांना माहिती देत राहू, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

ज्या भागात पाऊस कमी होणार आहे, तिथे…..

दरम्यान, डॉ. महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार एल निनोचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आयएमडीने याआधीच राज्यांना तसेच केंद्र सरकारला काय काळजी घ्यायला हवी, हे अगोदरच सांगितलेले आहे. ज्या भागात पाऊस कमी होणार आहे, तिथे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. बियाणांची अपलब्धता, जलव्यवस्थापन, पर्यायी पिके यावर सरकारकडून विशेष लक्ष दिले जात आहे.

Follow Us
पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला....
Maharashtra Monsoon Session | पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला विरोधक घेरणार!
अखेर तेच घडलं! ...म्हणून नेते बैठकीला गैरहजर; ठाकरेंचा पक्षात पुन्हा
अखेर तेच घडलं! ...म्हणून नेते बैठकीला गैरहजर; ठाकरेंचा पक्षात पुन्हा फूट पडणार? काही खासदार थेट...
मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर आता पुन्हा दबाव!
महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप
Kalyan | महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप; स्मार्ट मीटरवरून कल्याणमध्ये हल्लाबोल!
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल, काय मिळालं उत्तर?
वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन
मोठी बातमी! मनोरंजन विश्व हादरलं; वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन, नेमकं काय घडलं?
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसल
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसलं तिकडे स्वबळाची भाषा; राजकारणात मोठं वादळ?
संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; ठाकरेंचा भाजपला सल्ला
Sharmila Thackeray | आमची पोरं कशाला चोरता, संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; शर्मिला ठाकरेंचा भाजपला सल्ला
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस उपस्थित
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार शाळांमध्ये उपस्थित
सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
Manoj Jaranage | सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत