मावळ तालुक्यात 65 नागरिकांना प्रसादातून झाली विषबाधा ; जीवितहानी नाही

गावांमध्ये स्थानिक धार्मिक उत्सवात बनवल्या प्रसादातून ही विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. उत्सवाला उपस्थित असलेल्या ज्या ज्या लोकांनी प्रसादाचे सेवन केले त्यांना उलट्या, पोटदुखी व डोकेदुखीच्या तक्रारी सुरु झाल्या . विषबाधा झालेल्या सर्व लोकांना जवळच्या स्थानिक रुग्णालये तसेच पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर उपचार सुरु केले आहेत. घटनेची माहिती मिळताच पुणे जिल्हा परिषदेने एका पथकाची नेमणूक करत, ते घटनास्थळावर पाहणी करण्यासाठी पाठवण्यात आले.

मावळ तालुक्यात 65 नागरिकांना प्रसादातून झाली विषबाधा ; जीवितहानी नाही
pune zp
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 2:55 PM

पुणे – मावळ तालुक्यातील शिवली व भाडवली या दोन गावातील 65नागरिकांना प्रसादातून विषबाधा झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या गावांमध्ये स्थानिक धार्मिक उत्सवात बनवल्या प्रसादातून ही विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. उत्सवाला उपस्थित असलेल्या ज्या ज्या लोकांनी प्रसादाचे सेवन केले त्यांना उलट्या, पोटदुखी व डोकेदुखीच्या तक्रारी सुरु झाल्या . विषबाधा झालेल्या सर्व लोकांना जवळच्या स्थानिक रुग्णालये तसेच पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर उपचार सुरु केले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पुणे जिल्हा परिषदेने एका पथकाची नेमणूक करत, ते घटनास्थळावर पाहणी करण्यासाठी पाठवण्यात आले. या पथकाने उत्सवा दरम्यान बनवलेल्या प्रसाद व दुपारचे जेवण याची तपासणी केली. त्यात प्रसादासाठी वापरण्यात आलेलया पाण्यात गरजेपेक्षा क्लोरीनाची मात्र अधिक असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. गावातील पिण्याचे पाणी दूषित असल्याने ही घटना घडल्याची चर्चा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दुर्घटनेचे पाणी हे एकमेव कारण नाही या दुर्घटनेचे दूषित पाणी हे एकमेव कारण असू शकत नाही. केवळ पाण्यामुळंच ही समस्या निर्माण झाली असे म्हटले तरा गावातील इतर लोकही आजारी पडले असते तेही उत्सवाच्या आधी. या उत्सवाला साधारण 250  लोक उपस्थित होते. मात्र त्यातील केवळ 60  ते 65 लोकांनाच विषबाधा झाली अशी माहिती जिल्हापरिषदेचे अधिकारी सुधीर भागवत यांनी दिली आहे. घटनास्थळावरून अन्न व पाण्याचे नमुने घेण्यात आले असून तासपाणीसाठी राज्याच्या आरोग्य प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोग शाळेतील अहवालानंतर नेमके कारण कळू शकणार असल्याचेही ते म्हणले आहेत.

या घटनेत विषबाधा झालेल्या नागरिकांची प्रकृती ठीक आहे. अनेकांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरु असलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापुढे दूषितपाण्याच्या वापरामुळे अशी कोणतीही घटना होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषदेने दिली आहे.

विवाहित मैत्रिणीची अन्य पुरुषांशी मैत्री खटकली, बलात्काराचा प्रयत्न, नंतर कात्रीने गळ्यावर वार करुन हत्या

Hair Care : केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी जास्वंदाचे फुल अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक!

अल्पवयीन भाचीवर विवाहित मामाची वाकडी नजर, फूस लावून पळवले, आता तुरुंगात रवानगी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.