AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यावर मोठं संकट! तब्बल इतके जिल्हे धोक्यात, या वेळेत घराबाहेर पडणे टाळाच..

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठा बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. आजही राज्यावर मोठे संकट असल्याचे बघायला मिळत आहे. विदर्भासह मराठवाड्यात अलर्ट जारी करण्यात आला.

राज्यावर मोठं संकट! तब्बल इतके जिल्हे धोक्यात, या वेळेत घराबाहेर पडणे टाळाच..
Rain
| Updated on: May 10, 2026 | 7:12 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी उष्णता तर कधी पाऊस अशी स्थिती आहे. गेल्या आठ दिवसांपासून राज्यात सुर्य आग ओकताना दिसत आहे. स्थिती गंभीर होती. राज्यातील जवळपास जिल्ह्यांमध्ये तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले. तब्बल 46 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद झाली. आता पुन्हा एकदा उष्णता आणि पाऊस असे समीकरण बघायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा जारी केला. विदर्भासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भात जारी केला. वाशिम जिल्ह्यात राज्यातील सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली. वाशिममध्ये उच्चांकी 42.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी या भागाच उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.

बाकी मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला. ज्या भागात उष्णतेचा अलर्ट हवामान विभागाने जारी केला अशा भागातील नागरिकांनी अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, दुपारी 12 ते 4 यादरम्यान. सिंधुदुर्गामध्ये पावसाने गेले दोन दिवसापासून थैमान मांडलेलं पाहायला मिळते. खारेपाटण या परिसरामध्ये विजांच्या कडकडासह ,वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

तळकोकणात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. जिल्ह्यातील काही भागात वादळी वारा व विज्यांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला . दुपारच्या सत्रात कडक उन्ह आणि सायंकाळी पाऊस. मागील तीन दिवस जिल्ह्यात उन पावसाचा खेळ. जोरदार विजांच्या कडकडाटामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात वीज गायब. वादळी पावसामुळे अनेक भागात मोठे नुकसान झाले.

भंडारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. लाखनी तालुक्यातील जेवणाला परिसरात विक्रीसाठी तयार ठेवलेला मका पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे भिजण्याच्या संकटात सापडला. वाऱ्याच्या तडाख्याने मका झाकण्यासाठी टाकलेल्या त्रिपाल (ताडपत्री) उडून गेल्याने शेतकरी भर पावसात जीवाची बाजी लावत मका वाचवण्यासाठी धावपळ करताना दिसले. कष्टाने पिकवलेले पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची सुरू असलेली धडपड या घटनेतून समोर आली आहे.

Follow Us
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....