AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी, भारतीय हवामान विभागाकडून अंदाज, आज ‘या’ भागात मुसळधार पाऊस

Maharashtra Rain Update : ऑगस्ट महिन्याला सुरूवात झाली असून पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र बघायला मिळतंय. मात्र, भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आजही अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी, भारतीय हवामान विभागाकडून अंदाज, आज 'या' भागात मुसळधार पाऊस
Rain
| Updated on: Aug 03, 2025 | 7:36 AM
Share

आता ऑगस्ट महिन्याला सुरूवात झाली असून या महिन्यात अपेक्षित पाऊस होणार नसल्याचे सुरूवातीला सांगितले गेले. मात्र, भारतीय हवामान विभागाकडून ऑगस्ट महिन्यात पाऊस चांगला राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. यामुळे शेतकरी राजाला मोठा दिलासा नक्कीच मिळाला. यंदा मान्सूनने अपेक्षेपेक्षा आधीच देशात आणि राज्यात प्रवेश करत दमदार सुरुवात केली होती. जुलैच्या अखेरीस राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाला होता. पण आता ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज थेट भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी होणार असल्याचे सांगण्यात आल्याने पिकांमुळे शेतकरी राजा चिंतेत होता. मुंबईमध्ये आज सकाळीच पावसाने हजेरी लावलीये. कालही काही भागांमध्ये पाऊस झाला. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजनुसार आज (3 ऑगस्ट) राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये वादळी वारे विजांसह पाऊस पडेल.

हवामान विभागाकडून विदर्भात येलो अलर्ट हा जारी करण्यात आलाय. राज्यातील अनेक भागात आज ढगाळ वातावरण राहिलं. पुण्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याचे बघायला मिळतंय. यावर्षी सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाल्याने धरण क्षेत्रातील पाणीसाठा हा चांगलाच वाढलाय. खडकवासला धरणक्षेत्रातून मोठा पाणीसाठा मुळा मुठा नदीत विसर्ग करण्यात आला आहे.

खडकवासला 1.18 टीएमसी, पानशेत 9.49 टीएमसी, वरसगाव 11.44 टीएमसी, टेमघर 3.54 टीएमसी याप्रमाणे. कोकणात आज पावसाचा इशारा देण्यात आला असून मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही भागांमध्ये अजूनही शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा कायम आहे. सप्टेंबर महिन्यात देखील पाऊस चांगला राहण्याचा अंदाज वर्तवला जातोय. मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याचे सध्या बघायला मिळतंय.

Follow Us
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा