AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राज्यातील शाळांमध्ये मोबाईलवर बंदी आणली पाहिजे’, कीर्तनकार इंदोरीकर महाराजांची मागणी

राज्यातील शाळांमध्ये मोबाईल बंदी करण्याची मागणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार निवृत्ती इंदोरीकर महाराजांनी केली आहे. त्यांच्या या मागणीची दखल आता सरकारकडून घेतली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

'राज्यातील शाळांमध्ये मोबाईलवर बंदी आणली पाहिजे', कीर्तनकार इंदोरीकर महाराजांची मागणी
कीर्तनकार इंदोरीकर
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Sep 18, 2024 | 9:15 PM
Share

मोबाईल हा आपल्या आयुष्यातील जगण्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे. मोबाईलशिवाय आपल्याला चैन पडणार नाही. प्रत्येक व्यक्ती मोबाईलशिवाय घराबाहेर पडणार नाही. कुठेही बाहेर जायचं असेल तर आपण आधी मोबाईल घेतला ना? याची शहानिशा करतो. अर्थात मोबाईल हा तसा आवश्यक असला तरी त्याचा अतिवापर हा घातक ठरु शकतो. विशेष म्हणजे लहान मुलं आणि विद्यार्थी यांच्याकडून केला जाणारा मोबाईलचा अतिवापर हा त्यांच्यासाठी हानीकारक ठरु शकतो. याशिवाय अनेक शाळांमध्ये शाळा सुरु असण्याच्या कालावधीत शिक्षकांकडूनही मोबाईल वापरला जातो. या दोन्ही गोष्टींवर प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी शाळेत थेट मोबाईल बंदी करावी, अशी मागणी आपल्या कीर्तनातून केली आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान जसं वाढत आहे, तसं जग जवळ येत आहे, असं मानलं जात आहे. मोबाईल आणि इंटरनेटमुळे जग तर प्रचंड जवळ आलं आहे. हे वास्तव नाकारता येणार नाही. पण तरीदेखील मोबाईल आणि इंटरनेटचा वापर हा गरजेपुरताच करायला हवा. कारण गरजेपेक्षा त्याचा जास्त वापर किंवा अतिवापर केल्यास त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल वापरण्याचे परिणाम वाढताना दिसत आहेत. अर्थात या मोबाईलचा वापर शैक्षणिक कारणांसाठी होत असेल तर चांगलंच आहे. पण मुलांकडून अनेकदा केवळ गेम खेळण्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो. त्यामुळे मोबाईलच्या बाबतीत विद्यार्थ्यांसाठी काही बंधनं असणं आवश्यक असल्याचं म्हटलं जातं. याचबाबत प्रसिद्ध कीर्तनकार यांनी आपल्या कीर्तनात शाळेत मोबाईल बंदी करण्याची मागणी केली आहे.

इंदोरीकर महाराज नेमकं काय म्हणाले?

राज्यातील शाळांमध्ये मोबाईल बंदी करण्याची मागणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार निवृत्ती इंदोरीकर महाराजांनी केली आहे. शाळेत शिक्षकांच्या मोबाईलच्या वापरामुळे शाळांमधील मुलांच्या शिक्षणावर थेट परिणाम होत असल्याचा दावा इंदुरीकर महाराज यांनी केला आहे. त्यामुळे रोज शाळेच्या सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या वेळेत शाळेत मोबाईल बंदी करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. अकोल्यात कीर्तनात त्यांनी याबाबतचं वक्तव्य केलं आहे.

Follow Us
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर मुख्यंमत्र्यासोबतच्या विमान प्रवासाबाबत दिली मोठी अपडेट
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
Omraje Nimbalkar | इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा डाव; पदाधिकाऱ्यांना...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून... उद्धव ठाकरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान