AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यानंतर जळगावातील हिट अँड रन प्रकरणावर प्रश्नचिन्ह, नेत्याच्या पोरानं तिघांना उडवलं

पुण्यातील घटना समोर आल्यानंतर जळगावातही हिट अँड रन प्रकरणावरुन पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुण्यात देखील एका नेत्याच्या पोरानं महिलेसह ३ मुलांना उडवलं. ज्यात चार जण ठार झालेत. ही मुलं देखील दारु पिऊन गाडी चालवत असल्याचा आरोप आहे.

पुण्यानंतर जळगावातील हिट अँड रन प्रकरणावर प्रश्नचिन्ह, नेत्याच्या पोरानं तिघांना उडवलं
| Updated on: May 22, 2024 | 11:07 PM
Share

पुण्यानंतर जळगावातही हिट अँड रन प्रकरणावरुन पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उभे राहत आहेत. बिल्डर आणि एका नेत्याच्या पोरानं महिलेसह तिच्या ३ मुलांना उडवलं. चार जण ठार झाले. धडक देणाऱ्या गाडीतून गांजाही जप्त झाला. मात्र १७ दिवस उलटूनही अद्याप आरोपींचे ब्लड रिपोर्ट आलेले नाहीत. जळगावचे नेतेही यावर गप्प आहेत. पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण देशभर गाजतंय. मात्र असाच प्रकार काही दिवसांपूर्वी जळगावात सुद्धा घडला होता. त्यात सुद्धा बऱ्यापैकी पुण्याच्या घटनेप्रमाणेच साम्य आहे. इथंही दुचाकीला धडक देणारे आरोपी बिल्डरचा आणि राजकारण्याचा मुलगा आहे.

दुर्घनेत चौघांचा मृत्यू

राजकीय आशीर्वादामुळे पोलिसांनी कारवाईस कसूर केल्याचा आरोप होतोय. 7 मे ला ही दुर्घटना घडलीये. राणी चव्हाण नावाच्या आशा स्वयंसेविका इलेक्शन ड्युटी संपवून घरी परतत होत्या. दुचाकीवर त्यांच्यासोबत ७ आणि ४ वर्षांची दोन मुलं आणि १६ वर्षाचा एक भाचा होता. जळगावच्या रामवाडीजवळ एका कारनं दुचाकीला धडक दिली. यात राणी चव्हाण यांच्यासह त्यांच्यासोबतच्या तिन्ही मुलांचा मृत्यू झाला.

कोण आहेत ती मुलं

मिळालेल्या माहितीनुसार ज्या कारनं धडक दिली., त्यापैकी एक जण जळगावच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचा मुलगा आहे. आणि दुसरा अभिषेक कौल नावाच्या बिल्डरचा मुलगा आहे. अपघातानंतर जमावानं कारमधल्या आरोपींना मारहाण केली. मारहाणीचं कारण देत पोलिसांनी आरोपींना मुंबईतल्या रुग्णालयात भर्ती केलं. अपघातावेळी कारचालक आणि कारमधले इतर जण दारुच्या नशेत होते.

रिपोर्ट यायला इतका उशीर का?

ज्या कारनं धडक दिली त्या कारमध्ये गांजाही सापडलाय. मात्र गाडीत गांजा सापडल्याची कलमं उशिरानं लावली गेली. शिवाय पुण्याप्रमाणेच या प्रकरणातही अपघाताला १७ दिवस होऊनही अद्यापही आरोपींचा ब्लड रिपोर्ट आलेला नाही. सर्वसामान्यांनी अपघात घडल्यावर अशी दिरंगाई होते का. ब्लड रिपोर्ट यायला १७ दिवस लागतात का? पोलिसांवर नेमका दबाव कुणाचा आहे. पुण्याच्या घटनेबरोबरच जळगावकरही हाच प्रश्न विचारत आहेत.

Follow Us
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.