AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावमधील सभेत आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळेंचं नाव घेत अमित शहा म्हणाले…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जळगावमधील सभेत बोलतावा मविआला पंक्चर असलेली रिक्षा म्हटलं आहे. इतकंच नाहीतर शरद पवार यांना 50 वर्षे सहन केल्याचं म्हणच शहा यांनी सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरेंची नावे घेत पाहा काय टीका केली.

जळगावमधील सभेत आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळेंचं नाव घेत अमित शहा म्हणाले...
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 05, 2024 | 5:27 PM
Share

जळगाव | आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जळगावमधील सागर पार्कमध्ये भाजप युवा संमेलनामध्ये बोलताना घराणेशाहीवर टीका केली. महाराष्ट्रातील जनता शरद पवार यांना 50 वर्षे झेलत असल्याचं म्हणत त्यांनी आपल्या भाषणामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांची नावं घेत निशाणा साधला.

काय म्हणाले अमित शाह?

सोनिया गांधींना राहुल गांधींना पंतप्रधान करायचं आहे. उद्धव ठाकरेंना आदित्यला मुख्यमंत्री करायचं आहे. शरद पवार यांना सुप्रियाला मुख्यमंत्री बनवायचं आहे. ममता बॅनर्जींना भाच्याला मुख्यमंत्री करायचं आहे. तुमच्यासाठी कोणीच नाही. पण तुमच्यासाठी मोदी आहे. मोदींनी विकसीत भारताचं लक्ष ठेवलं आहे. महान भारताचं टार्गेट ठेवलं आहे. मोदींनी दहा वर्ष भारताला सुरक्षित ठेवण्याचं काम केल्याचं अमित शाह म्हणाले.

सोनिया-मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये बॉम्बस्फोट होत होते. मोदी आले आणि त्यांनी पुरी आणि पुलवामातील घटनेचा दहा दिवसात बदला घेतला. पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला. 370 कलम रद्द केलं. मोदींनी काश्मीरला भारताला जोडलं. काँग्रेसने 370 कलमवरून लटकवत ठेवलं. तुम्ही दुसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान केलं त्यांनी 370 कलम रद्द केल्याचं शाह यांनी म्हटलं आहे.

राहुल बाबांना ओळखता ना. ते मला संसदेत म्हणायचे 370 कलम हटवू नका. रक्ताच्या नद्या वाहतील असं राहुल गांधी म्हणायचे. राहुल बाबा 370 कलम हटवलं. पाच वर्षात रक्ताच्या नद्या सोडा, साधा दगडही उगारला गेला नाही. मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा काँग्रेसने म्हणाले, अर्थतज्ज्ञ पंतप्रधान बनवलं. वाजपेयींनी देशाला 11 व्या नंबरची अर्थव्यवस्था केलं. काँग्रेसने देशाला 11व्याच नंबरला ठेवलं. मोदींनी पाचव्या नंबरची अर्थव्यवस्था केल्याचं शहांनी सांगितलं.

Follow Us
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय...
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर... रोहित पवारांना नेमकं काय झालंय?
दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर... रोहित पवारांना नेमकं काय झालंय? ब्रीच कँडी रुग्णालयातील व्हिडीओ आला समोर
26 फेब्रुवारीच्या बैठकीत घडलं ते... निवडणूक आयोगाकडून NCP ला तातडीचे न
Sunetra Pawar | निवडणूक आयोगाकडून NCP ला तातडीचे निर्देश; 26 फेब्रुवारीच्या बैठकीत घडलं ते...
उद्धव ठाकरेंना आणखी मोठा हादरा! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्यानं
उद्धव ठाकरेंना आणखी मोठा हादरा! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्यानंतर...
ट्रेकिंगचा थरार ठरला जीवघेणा! दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मोठी बातमी! रायगडमध्ये ट्रेकिंगचा थरार ठरला जीवघेणा! दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मोठी बातमी! Gen Z बाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोठा निर्णय; मुंबईत
मोठी बातमी! Gen Z बाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोठा निर्णय; मुंबईत तब्बल 2000...
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडे
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडेंचंही मोठं विधान
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते...
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते, पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाने खळबळ!
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी...
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी, म्हणाले मराठ्यांच्या नादी ...
CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व...
मोठा दिलासा! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व राज्यांना आदेश