AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिंकूनही उद्धव ठाकरे रडीचा डाव का खेळताहेत?; भाजप नेत्याचा थेट सवाल

Girish Mahajan on Uddhav Thackeray : भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. तेव्हा बोलकाना महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. गिरीश महाजन काय म्हणाले? वाचा सविस्तर...

जिंकूनही उद्धव ठाकरे रडीचा डाव का खेळताहेत?; भाजप नेत्याचा थेट सवाल
उद्धव ठाकरे
| Updated on: Jun 23, 2024 | 6:25 PM
Share

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आता तुम्ही विजयी झालेला आहात. मग आता तुम्ही उत्सव साजरे करा. आनंद साजरा करा. उलट रडत का बसताहेत? असा रडीचा डाव आता खेळू नका. हा शेवटी निवडणूक आयोगाचा अधिकार आहे ते काय कारवाई करणार ते मला माहित नाही, असं म्हणत भाजप नेते गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. त्यानंतर आता बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना दिसतात. यावर बोलताना गिरीश महाजनांनी टोला लगावला आहे. जळगावात महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी हे विधान केलं आहे.

निवडणूक काळाप पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहेय यावर असे आरोप प्रत्यारोप हे होतच असतात. पराभव समोर दिसला की आधीच असे कारण शोधले जातात. मतपेटी ईव्हीएम हा तर त्यांचा विषय ठरलेला आहे. मात्र आता त्यांचा जागा जास्त आल्या म्हणून हा विषय आता सध्या बंद झाला आहे. मी सुद्धा तो व्हीडिओ बघितला आहे. मात्र पैसे हे मतदानासाठी दिले की इतर कुठल्या प्रक्रियेसाठी दिले हा तपासाचा भाग आहे. त्यांनी जर तक्रार दिली तर निवडणूक आयोग चौकशी करेल आणि योग्य ती कारवाई करेल, असं महाजन म्हणाले.

जयंत पाटलांना प्रत्युत्तर

जयंत पाटील आणि देश काही संबंध आहे का? जयंत पाटील यांनी राज्यात त्यांच्या पक्षाचे काम करावं. नरेंद्र मोदीजींवर भाजपचा आणि लोकांचा विश्वास आहे. 240 जागा भाजपच्या निवडून आल्या आहेत.मग तुम्ही का देशाची चिंता करता आहात? तसं असतं तर लोकांनी आम्हाला मताधिक्य दिलं नसतं. एवढ्या जागा निवडून दिल्या नसत्या, असं गिरीश महाजन म्हणाले.

जरांगेंच्या विधानावर प्रतिक्रिया

मनोज जरांगे पाटील काहीही म्हणाले तरी मला आता त्या विषयावर बोलायचं नाही. त्यांचं म्हणणं काहीही असलं तरी मला त्या विषयावर काहीही बोलायचे नाही, असं म्हणत गिरीश महाजन यांनी मनोज जरांगेच्या भूमिकेवर भाष्य केलंय.

स्मिताताई वाघ या पहिल्यांदा खासदार झालेल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या संपर्कात राहा लोकांशी संपर्क तोडू नका. खासदार झाले म्हणून आता लोकांचा संपर्क तोडू नका, असा सल्ला मी त्यांना दिलेला आहे.स्मिता ताई यांनी जास्तीत जास्त वेळ हा मतदारसंघासाठी लोकांचे काम करण्यासाठी लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी द्यावा हे मी त्यांना सांगितलंय, असंही गिरीश महाजन म्हणाले.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.