AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आली बाबा चाळीस चोरांचे सरकार आले आणि…”;’मविआ’वर भाजप आमदाराने तोंडसूख घेतले…

महाविकास आघाडीवर टीका करताना आमदार लोणीकर यांनी म्हटले आहे की, अगोदरचे सरकार म्हणजे आंधळं दळते आणि कुत्रे पीठ खाते तशी अवस्था होती.

आली बाबा चाळीस चोरांचे सरकार आले आणि...;'मविआ'वर भाजप आमदाराने तोंडसूख घेतले...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jan 21, 2023 | 9:35 PM
Share

जालनाः पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकी जाहीर झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार हल्ला प्रतिहल्ला करत आहेत. त्यातच पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारांच्या प्रचाराप्रसंगी बोलताना सत्ताधाऱ्यांकडून महाविकास आघाडीवर सडकून टीकी केली जात आहे. तर तेवढ्याच ताकदीने विरोधकांकडून पलटवार केला जात आहे.

जालना येथे भाजप आमदार बबनराव लोणीकर बोलत असताना त्यांनी शिंदे गट आणि भाजपचे 200 आमदार निवडून आणण्यासाठी चंद्रकांत बावनकुळे महाराष्ट्रभर फिरत आहेत असल्याचे सांगत त्यांनी राज्यात आणि देशात फक्त भाजपची सत्ता आणायची आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री ते पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदापर्यंत एक हाती सत्ता भाजपची आणायची आहे. त्यामुळे सर्वस्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे असं मतही त्यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडीवर टीका करताना आमदार लोणीकर यांनी म्हटले आहे की, अगोदरचे सरकार म्हणजे आंधळं दळते आणि कुत्रे पीठ खाते तशी अवस्था होती.

तर त्याच वेळी त्याआधीच्या भाजपचे सरकार असताना आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे असताना त्यांनी राज्यात विजेचे जाळे निर्माण केले तर महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर अलीबाबा चाळीस चोरांचे सरकार आले आणि वॉटर ग्रीड योजना बंद केली असा जोरदा टोलाही त्यांनी त्यांना लगावला.

परभणी लोकसभा निवडणूक भाजपला जिंकायची आहे. कोरोना काळात मुख्यमंत्री घराबाहेर निघाले नसल्याचे सांगत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

आमदार बबनराव लोणीकर यांनी महाविकास आघाडीच्या सरकारव सडकून टीका केली. यावेळी त्यांनी आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते अशी अवस्था महाविकास आघाडीच्या सरकारची होती. त्यामुळे राज्यात ते सरकार आल्यानंतर वाईट दिवस आले असल्याची जहरी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....