AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 टक्के आरक्षण मनोज जरांगेंना मान्य नाही; म्हणाले, हे अजिबात चालणार नाही…

Manoj Jarange Patil Maharashtra State Backward Class Draft Assembly Session Maratha Aarakshan Adhiveshan 2024 : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळणार असल्याचा राज्य मागासवर्गाच्या अहवालात उल्लेख आहे. पण हा निर्णय मनोज जरांगे पाटील यांना मान्य नाही. वाचा...

10 टक्के आरक्षण मनोज जरांगेंना मान्य नाही; म्हणाले, हे अजिबात चालणार नाही...
| Updated on: Feb 20, 2024 | 11:41 AM
Share

संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, अंतरवली सराटी, जालना | 20 फेब्रुवारी 2024 : राज्य मागासवर्गाचा अहवाल समोर आला आहे. यात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळणार असल्याची तरतूद आहे. मात्र हे दहा टक्के आरक्षण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मान्य नाही. सगेसोयरे शब्दाची अंमल बजावणी करा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील मागच्या बऱ्याच दिवसांपासून करत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी मनोज जरांगे यांनी सरकावर हल्लाबोल केलाय.

जरांगेंची भूमिका काय?

मराठा आरक्षणासंदर्भातील या विशेष अधिवेशनात राज्य मागासवर्ग आयोग जो अहवाल सादर करणार आहे. तो अहवाल टीव्ही 9 मराठीच्या हाती लागला आहे. यात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळणार असल्याचा उल्लेख आहे. मात्र हे 10 टक्के आरक्षण मराठा समाजाचं नुकसान करणारं आहे. या आरक्षणाचा मराठा समाजाला काहीही उपयोग होणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

हे अजिबात चालणार नाही- जरांगे

सगे सोयरे शब्दाची अंमलबजावणी केली पाहिजे, याची आम्ही मागणी केली आहे. करोडो मराठा बांधवांची मागणी आहे, की ओबीसीतून आरक्षण द्या. त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. वेगळ्याच गोष्टी समोर आणता, हे अजिबात चालणार नाही. सगे सोयरे शब्दाची अंमलबजावणी पाहिजे. नाहीतर उद्या आम्ही आमच्या आंदोलनाची दिशा ठरवू, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

तर पुन्हा आंदोलन- जरांगे पाटील

सरकारने सगळी प्रक्रिया केली आहे, हे खरं आहे. पण, ओपन कोर्टात curative petition ची hearing होणार आहे का? ओपन कोर्टात झालं नाही तर झालं मराठ्यांच्या नुकसान होणार आहे. हे फक्त ठिगळं देणं सुरू आहे. नोंदी सापडल्या आहेत म्हणाल्यावर त्यांना टेन्शन आहे का? आरक्षण देऊन टाका. समाज डोक्यावर घेऊन नाचेल. नाही तर आंदोलन अटळ आहे. पुढचं आंदोलन उद्या बघू. त्यांना जाम पुन्हा बघायचा म्हणाल्यावर उद्या बघू ना…त्यांना देणं घेणं नाही. राज्यातले एक नागरिक उपोषण करून मरो, आत्महत्या करो. पण मी माझाच तोरा गाजवणारा, अशी जर मग्रुरी असेल तर आम्ही मराठा आहोत. पुन्हा रस्त्यावर उतरवायला वेळ लागणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.