AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय मुंडेंसोबतच्या भेटीत काय चर्चा झाली?; मनोज जरांगेंनी स्पष्टपणे सांगितलं

Manoj Jarange and Dhananjay Munde Meeting : अंतरवली सराटी गावात जात मंत्री धनंजय मुंडे यांनी मनो जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी या दोघांमध्ये काय चर्चा झाली? जरांगेंनी सांगितलंय. मनोज जरांगे यांनी आरक्षणाबाबत काय म्हटलं? परळीतील घोंगडी बैठकीचे अपडेट्स, वाचा सविस्तर...

धनंजय मुंडेंसोबतच्या भेटीत काय चर्चा झाली?; मनोज जरांगेंनी स्पष्टपणे सांगितलं
धनंजय मुंडे, मनोज जरांगे पाटीलImage Credit source: Facebook
| Updated on: Sep 08, 2024 | 12:09 PM
Share

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. मध्यरात्री अंतरवली सराटी गावात जाऊन मुंडेंनी जरांगेंची भेट घेतली आहे. मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्यात दीर्घ चर्चा झाली. या दोघांमध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली? याबाबत मनोज जरांगेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. धनंजय मुंडे यांच्यासोबत चर्चा झाली. ती काही विशेष नव्हती. त्यात शेतकऱ्यांचा मुद्दा होता. ज्यावेळेस आमची आरक्षणबाबत चर्चा झाली त्यावेळेस ही व्यासपीठावर धनंजय मुंडे होते. मी माझ्या मुद्द्यावरती ठाम आहे. माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मी लढत राहणार आहे. ते आरक्षण फक्त ओबीसीतून मिळावं, यासाठी कायम ठाम असणार आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

धनंजय मुंडेंशी काय चर्चा?

आमची आरक्षणावर चर्चा झालीच. मला आरक्षणाशिवाय दुसरं काही नाही. समोरचाच वेगळंच असतं आणि माझं वेगळंच असतं. मी झोपेत होतो आणि ते आले तीन वाजले असतील अंदाजे. 20 एक मिनिट चर्चा झाली. अंतरवलीत कोणीही येऊ शकतो. यावेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची चर्चा झाली. मराठा आरक्षणावर आमची चर्चा झाली, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.

मनोज जरांगे आरक्षणाबाबत काय म्हणाले?

इथे कोणीही येऊ शकतं तो आमचा पाहुणा आहे. मला इथे मातृत्वाची भूमिका घ्यावी लागते. मी कोणाचाच होऊ शकत नाही. कोणत्या महाविकास आघाडीचा कोणत्या महायुतीचा मी नाही. मी फक्त मराठ्यांचा आहे. शंभुराज देसाई यांनी कुणबींना सहा महिने व्हॅलेडीटीची वाढ दिली आहे. बैठक परळीत आहे आणि ती ताकतीने होणार आहे. मी जातीवादी नाही. तसं कृषिमंत्र्यांनी चांगलं काम करायला लागली शेतकऱ्यांचं, तर कौतुक का करू नये, असं जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांची परळीत घोंगडी बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी जरांगे पाटील परळीत दाखल झालेत. दुपारी दोन वाजता परळीत ‘हलगे गार्डन’ या ठिकाणी घोंगडी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत जरांगे काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

निवडणुकीसाठी आम्ही तयार- जरांगे

विधानसभा निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलंय. आमच्याकडे आयतं मैदान आहे. आम्हाला तयारी करायची गरज नाही. त्यांनी उद्या जरी निवडणूक घेतली तरी तयार आहोत. ज्यांना गरीब मराठ्यांची गरज नाही, असं एक मोठा आमदार बोलू लागलेला आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी कागदपत्र अगोदरच काढून ठेवा. भाजपमधले काही आमदार मेले तरी बोलू शकत नाहीत. जातीच्या आणि आंदोलनाच्या विरोधात ते बोलू शकत नाही. आंदोलनात किती येतील याची संख्या कधीच मोजायची नसते. गाव स्तरावर खालच्या स्तरावर मी कधी जातीवाद करत नाही. मराठा आता परिवर्तनाच्या दिशेने निघालेला आहे तू पक्षाच्या बाजूने बोलत नाही, असंही मनोज जरांगेंनी म्हटलंय.

मुंबई महानगरपालिकेच्या 18 प्रभाग समितीपैकी 8 प्रभाग समिती ठाकरेंकडे?
मुंबई महानगरपालिकेच्या 18 प्रभाग समितीपैकी 8 प्रभाग समिती ठाकरेंकडे?.
अखेर भाजपचा गटनेता ठरला! गणेश खणकरांची वर्णी
अखेर भाजपचा गटनेता ठरला! गणेश खणकरांची वर्णी.
... म्हणून हा कट शिजला, अन् ठिणगी पडली! विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
... म्हणून हा कट शिजला, अन् ठिणगी पडली! विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप.
अजितदादांनी भाजपच्या फाईलवर भाष्य केलं अन् 10 दिवसाने अपघात झाला...
अजितदादांनी भाजपच्या फाईलवर भाष्य केलं अन् 10 दिवसाने अपघात झाला....
सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळावर पोहोचल्या
सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळावर पोहोचल्या.
कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी शेतात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी शेतात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.
त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं.
विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!
विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!.
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?.
आधी गोंधळ, नंतर स्पष्टीकरण! पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानं काय घडलं?
आधी गोंधळ, नंतर स्पष्टीकरण! पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानं काय घडलं?.