AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजा, आता तरी बरस… बळीराजाचे देवाला साकडे, पेरण्या झाल्या पण पाऊस कुठंय?

Farmer and Monsoon : जूनचा दुसरा आठवडा संपत आला आहे पण अजूनही आभाळाने दार उघडलेलं नाही. पावसाचा एकही थेंब जमिनीवर पडलेला नाही, त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.

राजा, आता तरी बरस... बळीराजाचे देवाला साकडे, पेरण्या झाल्या पण पाऊस कुठंय?
Maharashtra Farmer Waiting For RainImage Credit source: Google
| Updated on: Jun 13, 2026 | 6:04 PM
Share

राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप पावसाला सुरूवात झालेली नाही. पावसाअभावी शेतकरी अडचणीत सापडू लागला आहे. जूनचा दुसरा आठवडा संपत आला आहे पण अजूनही आभाळाने दार उघडलेलं नाही. पावसाचा एकही थेंब जमिनीवर पडलेला नाही. इकडे शेतकऱ्याने मात्र आशेच्या भरवशावर शेत तयार करून ठेवले आहे. मशागत पूर्ण केली, खत-बियाणे घरात आणून ठेवले, पण आभाळाकडे पाहणारे त्याचे डोळे अजूनही प्रतीक्षेतच आहेत. छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अशीच स्थिती आहे.

संभाजीनगरमधील शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा

बळीराजासाठी पाऊस म्हणजे केवळ पाणी नाही, तर त्याच्या संसाराचा श्वास आहे. याच पावसावर लेकरांच्या शिक्षणाची स्वप्नं अवलंबून आहेत. मुला-मुलींच्या लग्नाची जबाबदारी अवलंबून आहे. घरखर्च, दवाखाना आणि वर्षभराच्या उदरनिर्वाहाची आशा अवलंबून आहे. आज शेतात उभा असलेला शेतकरी काळ्या ढगांची वाट पाहतोय. आभाळाकडे पाहतोय आणि मनोमन एकच प्रार्थना करतोय, “राजा, आता तरी बरस…” कारण जमिनीला ओल हवी आहे, पण त्याहून जास्त ओल या शेतकऱ्याच्या कोरड्या पडलेल्या आशांना हवी आहे. बळीराजा आज चातकाप्रमाणे पावसाच्या एका थेंबाची वाट पाहत आहे. छत्रपती संभाजी नगरच्या भिमवाडीतील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

बुलढाण्यातील शेतकऱ्यांचे पावसाकडे डोळे

दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरीही पावसाकडे डोळे लावून बसला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे आटोपून तयार ठेवली असून पेरणीची तयारीही पूर्ण झाली आहे. मात्र जून महिना अर्धा संपला, रोहिणी नक्षत्र संपले, मृग नक्षत्र सुरू आहे , मात्र पावसाची अपेक्षा लागून आहे . पाऊस पडत नसल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे उघडा ठेऊन उभा आहे. जर लवकर पाऊस पडला नाही, तर उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार देशात यंदा एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे. देशाच्या काही भागात दुष्काळाचीही भीती आहे. त्यामुळे शेतमालाच्या उत्पादनात मोठी घट होऊ शकते. यामुळे थेट देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतो.

Follow Us
मुंबईत मोठ्या घडामोडी! ठाकरे बंधूंच्या विजय सभेपूर्वीच...
Mumbai | मुंबईत मोठ्या घडामोडी! ठाकरे बंधूंच्या विजय सभेपूर्वीच...
प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; सगळीकडे लगबग,पहा
Thackeray Brothers Sabha | प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; सगळीकडे लगबग, पहा व्हिडीओ
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...