Maharashtra News LIVE : राज्यात पावसाची धुवांधार बॅटिंग, अनेक जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट
Maharashtra News LIVE : राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अनेक भागात कोसळधार सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे धुमशान सुरू आहे. मुंबईसह परिसरात पावसाने दमदार सुरुवात केली आहे. भिवंडीत इमारत कोसळली आहे. तर राज्यसभेतही सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मंजूर झाले आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
Bhiwandi tragedy : भिवंडीत धोकादायक इमारत कोसळून मोठी दुर्घटना; मृतांचा आकडा वाढला
भिवंडीत धोकादायक इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाकडून बचत कार्य सुरू आहे. घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांकडून आक्रोश व्यक्त केला जात आहे. प्रशासकीय अधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित आहेत.
-
अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. नांदगाव खंडेश्वर मध्ये अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना प्रशासनाकडून आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शाळा महाविद्यालय सुट्टीचे परिपत्रक काढण्यात आले.
-
-
वर्धा जिल्ह्यात रात्रभर पाऊस
वर्धा जिल्ह्यात रात्रभर पाऊस होता. सकाळी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. वर्धा ते राळेगाव मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. सरूळ गावाजवळ यशोदा नदीवरील पुलावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली.अलमडोह – अल्लीपूर मार्गावरील वाहतूकही बंद झाली.
-
गोंदियातील पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच
गोंदिया जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले दुधडी भरून वाहत आहेत, तर अश्यातच गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला या धारणा मध्ये पाणी साठा वाढत असल्याने सध्या च्या घडीला 83 टक्के धरण भरले असल्याने धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग होत असून या धरणाचे 13 पैकी 6 दरवाजे उघडण्यात आले आहे. तर धरणातील पाणी पातळी वाढली तर आणखी दरवाजे उघडण्यात येणार आहेत.
-
धाराशिव जिल्ह्यात मध्यरात्रीपासून जोरदार पावसाची हजेरी
धाराशिव जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सुरुवातीच्या काळात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी आणि नागरिक चिंतेत होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत सातत्याने पाऊस सुरू असून मध्यरात्रीपासून त्याचा जोर अधिक वाढला आहे. या पावसामुळे पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोयाबीन, तूर यांसह खरीप पिकांना या पावसाचा मोठा दिलासा मिळणार आहे
-
-
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक प्रमुख नद्यांना मोठा पूर
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक प्रमुख नद्यांना मोठा पूर आलेला असून जिल्ह्यातील ४ राष्ट्रीय महामार्गांसह दुर्गम भागातील १६ रस्ते बंद आहेत. भामरागड सिरोंचा अशा दोन तालुक्यात विद्युत सेवा व दूरध्वनी सेवा खंडित झाल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. पुरामुळे काल सायंकाळी गडचिरोली जिल्ह्यात दोन घटना घडली असून एक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची कार पुरात वाहून गेली. तर दुसर्या ठिकाणी चार युवकांनी हुज्जत घालून दुचाकी पुराच्या पाण्यात टाकल्यामुळे एक दुचाकी वाहून गेली. सध्याही अनेक रस्ते बंद असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. जिल्ह्यातील वैनगंगा गोदावरी प्राणहिता इंद्रावती प्रमुख नद्या धोका पातळीच्या जवळ जवळ वाहत असून सध्या पाऊस नसला तरी पूर परिस्थिती कायम आहे
-
भिवंडीत झोपेतच काळाचा घाला, इमारत कोसळून तीन ठार
भिवंडीतील कोहिनुर हि धोकादायक इमारत रात्री 11 वाजता कोसळली. ढिगाऱ्याखालून 9 तासानंतर 3 रा मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले आहे. त्याचबरोबर अजून काही जण ढिगार्याखाली असल्याची माहिती मिळत आहे. तीन मृतदेह ढिगाऱ्याबाहेर काढल्यानंतर पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. तिन्हीही मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील आय जी एम सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
-
Maharashtra News LIVE : राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भिवंडीत चार मजली इमारत कोसळली आहे. बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आले आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोलीत पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. अमरावतीमधील मेळघाटत पावसामुळे अनेक भाग पाण्याखाली गेला आहे.
लोकसभेनंतर राज्यसभेतही सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. आता नवीन कायद्यानुसार पेपरफुटीप्रकरणात दोषींवर कडक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. राज्यसभेतही काल जोरदार हंगामा झाला. पेपरफुटीत भाजपचे 8 जणांचा समावेश असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. पेपर लीक करणाऱ्या गँगला सोडणार नाही असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. त्यांनी काल राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची भेट घेतली. मोदींनी अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खर्गे यांनी केली. तर जंतरमंतरवरील आंदोलकांवर कारवाई न करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला.
Published On - Jul 31,2026 8:08 AM
