AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परतीचा पाऊस पुन्हा परतला, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान

गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर अचानक पावसाने पुन्हा राज्यात हजेरी लावली (Maharashtra Rain). राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या. मुंबई शहरासह उपनगरांतही जोरदार पावसाने हजेरी लावली. तसेच, पालघर, नाशिक, जळगाव, मनमाड, बुलडाणा इत्यादी शहरांतही पाऊस झाला

परतीचा पाऊस पुन्हा परतला, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान
| Updated on: Nov 02, 2019 | 9:34 AM
Share

मुंबई : गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर शुक्रवारी (1 नोव्हेंबर) पावसाने अचानक पुन्हा राज्यात हजेरी लावली (Maharashtra Rain). राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या. मुंबई शहरासह उपनगरांतही जोरदार पावसाने हजेरी लावली. तसेच, पालघर, नाशिक, जळगाव, मनमाड, बुलडाणा इत्यादी शहरांतही पाऊस झाला (Maharashtra Rain). भर उन्हात अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची दाणादाण उडाली. तर या परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातात आलेली पीकं पावसामुळे उध्वस्त झाल्याने बळीराजा पुन्हा एकदा हवालदील झाला आहे.

मुंबईत शुक्रवारी (1 नोव्हेंबर) सायंकाळी चारच्या सुमारास दादर, परळपासून पुढे कुलाब्यापर्यंत अचानक आभाळ भरून आलं आणि पावसाला सुरुवात झाली. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसह रायगड, कोकण भागात पावसाची दाट शक्यता वर्तवली होती. तसेच, ठाणे, पालघर आणि रायगडच्या पट्ट्यातही ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.

पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. याआधी पडलेल्या परतीच्या पावसानंतर आता पुन्हा अवेळी हा पाऊस परतला आहे. हवामान खात्याने हा पाऊस आणखी काही दिवस राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. पालघरमध्ये सायंकाळी सात वाजेनंतर पावसाला सुरुवात झाली. अवेळी आलेल्या या परतीच्या पावसामुळे भात कापून ठेवलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पालघर, बोइसर, मनोर, केवे सफाळे परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी भाताच्या पिकाची कापणी केली होती. मात्र, काल झालेल्या पावसामुळे ते भातपीकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

येवला शहरासह परिसरातही मुसळधार पाऊस झाला. तर मनमाडमध्येही रात्रभर मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे रेल्वे बंधारा आणि वागदरडी धरण ओवर फ्लो होऊन वाहू लागले. पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या रामगूळणा आणि पांझण या दोन्ही नद्यांना पूर आल्याचं चित्र आहे. तर अनेक घरांमध्ये हे पुराचे पाणी शिरलं. पावसामुळे शिवाजी नगर, हुडको या भागांचा शहराशी संपर्क तुटला.

जळगावातही शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. चाळीसगाव पाचोरा, भडगाव परिसरात गेल्या 16 तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या बे-मोसमी पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं असून शेतीपिकांची मोठी हानी झाली आहे. तेसच, फळबागाही पूर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातही काही भागात मुसळधार पाऊस झाला. पावसाने 2 दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा हजेरी लावल्य़ाने नागरिक हैराण झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. चांदवड, दिंडोरी, भागात जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. या पावसामुळे नाशिकमधील द्राक्षांच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा.