AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमची कागदपत्रं अडवली तर…, जरांगे पाटील पुन्हा कडाडले, सरकारला नवा इशारा काय?

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे, ते धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना बोलत होते.

आमची कागदपत्रं अडवली तर..., जरांगे पाटील पुन्हा कडाडले, सरकारला नवा इशारा काय?
| Updated on: Jul 09, 2025 | 7:06 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला, त्यांनी अनेकदा उपोषण देखील केलं. दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे.  काही दिवसांपूर्वीच अंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, या बैठकीला राज्यभरातील मराठा बांधव उपस्थित होते. या बैठकीममध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनाची घोषणा केली आहे.  आता मराठा समजाला कोणीही रोखू शकत नाही, विजय मिळूनच गुलाल फेकायचा, अंतिम लढाई आहे, आरपारची लढाई आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं.

29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हा मराठी समाजाचा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे. 27 ऑगस्टला हा मोर्चा अंतरवाली सराटी येथून निघणार आहे. त्यानंतर तो 29 ऑगस्ट रोजी मुंबईत पोहोचणार आहे. दरम्यान आता या मोर्चाची तयारी सुरू आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे चावडी बैठका घेत आहेत, धाराशिव जिल्ह्यातल्या कार या गावात जरांगे पाटील यांची बैठक पार पडली, या बैठकीत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला इशारा दिला आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?  

आमची कागदपत्रं अडवली तर आम्ही शासकीय कार्यालयाला घेराव घालणार आहोत, मराठ्यांच्या मुलांचं नुकसान होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाहीत, आमच्या लेकरांचं वाटोळ होत असेल तर आम्हालाही कळतं सरकारला कस नीट करायचं, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर देखील आरोप केला आहे. कुणबी सर्टिफिकेट देऊ नयेत यासाठी संजय शिरसाट  हे अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.

मुंबईचा जाण्याचा मार्ग

आंतरवलीतून 27 ऑगस्टला निघाल्यानंतर शहागड, पैठण, शेवगाव, पांढरीपूल, अहिल्यानगर नेप्टी नाका मार्गे, आळेफाटा, शिवनेरी दर्शन, माळशेज घाट, कल्याण, वाशी, चेंबूर, मंत्रालय

पर्यायी मार्ग

पैठण,गंगापूर,वैजापूर,येवला,नाशिक, मुंबई

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.