AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगेंनी भर दसरा मेळाव्यात तो शब्द उच्चारला अन् लाखोंच्या काळजाचा ठोकाच चुकला, सर्वत्र फक्त शांतता, नेमकं काय घडलं?

मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा आज नारायण गड येथे पार पडत आहे. तब्येत बरी नसताना देखील मनोज जरांगे पाटील हे या मेळाव्याला उपस्थित आहेत. यावेळी बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे.

मनोज जरांगेंनी भर दसरा मेळाव्यात तो शब्द उच्चारला अन् लाखोंच्या काळजाचा ठोकाच चुकला, सर्वत्र फक्त शांतता, नेमकं काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2025 | 3:16 PM
Share

आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा नारायण गड येथे दसरा मेळावा पार पडला, मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बरी नसताना देखील त्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली आहे. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येनं लोक उपस्थित आहेत. दरम्यान या मेळाव्यात बोलताना पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी केलेल्या एका विधानामुळे सर्व उपस्थित असलेले लोक चांगलेच भावुक झाल्याचे पहायला मिळाले.  ‘शररीरात ताकद नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, आठवत असली तर बघा, एक पाच सहा महिन्यांपूर्वी सांगितलं होतं. प्रत्येकाला सांगितलं होतं, मी थोड्याच दिवसाचा पाव्हणा आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील? 

आज खासदारांपासून आमदारांपर्यंत सर्वच जणांनी या पवित्र नारायण गडाच्या कुशीत येऊन मोठेपण सिद्ध केलं. मला बोलताना खूप त्रास होत आहे. आपला गड नगद आहे म्हणून मला ताकद मिळतेय. मला ताकद मिळाली तशी शेतकऱ्यांना मिळावी. खूप वेदना आहेत, शररीरात ताकद नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, आठवत असली तर बघा. एक पाच सहा महिन्यांपूर्वी सांगितलं होतं. प्रत्येकाला सांगितलं होतं. मी थोड्या दिवसाचा पाव्हणा आहे, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आपण मुंबईला जायची हाक दिली, तेव्हा मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती. शेवटी शरीर आहे. काही सांगता येत नाही. माझ्या गरिबाच्या लेकराच्या आयुष्याचं कल्याण करू द्या. मुंबईला चला, कारण मी त्याचवेळी ही गोष्ट सांगितली होती. मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकरांना आरक्षण दिलेलं पाहायचं आहे. मागे कोणी हटू नका. कुणी मागे सरकू नका. अशी संधी पुन्हा सोडू नका. तुम्ही आता साथ दिली, त्यामुळे माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण करू शकतो, तुम्ही साथ दिली आपण जीआर घेऊन लढाई जिंकली. आता मला चिंता नाही. मी थोड्या दिवसाचा पाव्हणा असो की लय दिवसाचा. मला चिंता राहिली नाही, असं जरांगे यांनी यावेळी म्हटलं आहे.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.