AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : महाराष्ट्रात गुजराती साहित्य संमेलन, राज ठाकरेंनी एका वाक्यात लावला निकाल, म्हणाले…

Raj Thackeray : "महाराष्ट्रात आम्ही स्वाभिमान आणि स्वत्व घालवत आहोत. जेव्हा स्वाभिमान विकला जातो, तेव्हा उरतात जिवंत प्रेतं. महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा आहे. त्यामुळे तुम्ही जिवंत असलं पाहिजे. तुम्ही मोठं झालं पाहिजे. पण महाराष्ट्र विकून होता कामा नये" असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray : महाराष्ट्रात गुजराती साहित्य संमेलन, राज ठाकरेंनी एका वाक्यात लावला निकाल, म्हणाले...
Raj Thackeray
| Updated on: Aug 02, 2025 | 1:48 PM
Share

“महाराष्ट्र राज्य स्वत: गुजराती साहित्य संमेलन भरवत आहेत. भरू देत. व्यापाऱ्यांच्या चोपड्यांमधून, पुस्तकांच्या चोपड्यात लक्ष गेलं तर जास्ती बरं. पण हे काय चालू आहे. केवळ गुजराती माणसाबद्दलचं प्रेम नाही. मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागावी. त्यांची भांडणं व्हावी. त्यातून मतं कशी काढू शकतो, त्यासाठी काय काय करता येईल, यासाठीचे उद्योग आहेत” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. ते रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते.

“त्यांना वाटलं राज ठाकरे, संजय राऊत आम्ही त्यावर लगेच रिअॅक्ट होऊ. होणार नाही. आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू. तुम्हाला जे पाहिजे ते करणार नाही. बिलकूल करणार नाही. जेव्हा समजेल तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय तेव्हा अंगावरच येऊ. कान बंद ठेवू नका. डोळेबंद ठेवू नका, आजूबाजूला काय चाललंय त्याकडे लक्ष द्या” असं राज ठाकरेंनी आवाहन केलं.

…तेव्हा वेळ निघून गेलेली असेल

“तरुण आणि तरुणींनो लक्ष ठेवा. तुम्ही विकले जातात. तुमच्या पायाखालची जमीन निसटतेय. तुमची भाषा निघून जाईल. कालांतराने पश्चात्तापाचा हात कपाळाला लागेल. तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. पैसे कमावले पाहिजे,. कुटुंब उभं केलं पाहिजे. पण महाराष्ट्र विकून नाही” असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

‘…तेव्हा उरतात जिवंत प्रेतं’

“बाहेरच्या राज्यात आपल्याबद्दल काय बोलतात माहीत आहे का, ही विकत घेणारी माणसं असं बोललं जातं. ही आपली प्रतिमा आहे. सव्वाशे वर्ष हिंद प्रांतावर राज्य करणारा महाराष्ट्र आहे. तो विकला जातो. माणसं विकली जातात. आपली जमीन आणि भाषा सोडतो. कशाला पुतळे ठेवतो शिवाजी महाराजांचे? डेकोरेशन म्हणून, फारसी शब्द असू नये म्हणून स्वताचा राजकोष काढणारा माणूस, ज्याने मराठीत बोलायला सांगितलं. त्या महाराष्ट्रात आम्ही स्वाभिमान आणि स्वत्व घालवत आहोत. जेव्हा स्वाभिमान विकला जातो, तेव्हा उरतात जिवंत प्रेतं. महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा आहे. त्यामुळे तुम्ही जिवंत असलं पाहिजे. तुम्ही मोठं झालं पाहिजे. पण महाराष्ट्र विकून होता कामा नये. कुणाच्या आहारी जाऊ नका” असं राज ठाकरे म्हणाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.