AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कार थेट समुद्राच्या पाण्यात, कोस्टल रोडवर भीषण अपघात, सुरक्षा बलाच्या जवानांनी समुद्रात मारली उडी अन्…

Mumbai Coastal Road Accident: मुंबईत एक विचित्र अपघात घडला आहे. मुंबईच्या वरळी कोस्टल पुलावरुन एक आर्टिका कार पुलाचा कठडा तोडून थेट समुद्राच्या पाण्यात कोसळली आहे. ही घटना सोमवारी रात्री 10.50 वाजता घडली. या घटनेतील चालकाचा जीव वाचला आहे.

कार थेट समुद्राच्या पाण्यात, कोस्टल रोडवर भीषण अपघात, सुरक्षा बलाच्या जवानांनी समुद्रात मारली उडी अन्...
Car Fall in Sea
| Updated on: Oct 07, 2025 | 6:23 PM
Share

मुंबईत एक विचित्र अपघात घडला आहे. मुंबईच्या वरळी कोस्टल पुलावरुन एक आर्टिका कार पुलाचा कठडा तोडून थेट समुद्राच्या पाण्यात कोसळली आहे. ही घटना सोमवारी रात्री 10.50 वाजता घडली. वरळी वरून बांद्राला जाणाऱ्या कोस्टल ब्रिजवर एक कारचा अचानक नियंत्रण बिघडला आणि पुलाची रेलिंग तोडून चालक गाडीसह समुद्राच्या पाण्यात गेला. कारमध्ये चालक एकटाच होता. सुरक्षा बलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे चालकाचा जीव वाचला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कोस्टल रोडवरून कार समुद्रात कोसळली

वरळी कोस्टल रोडवरून एक कार वरळी वरून बांद्र्याच्या दिशेने जात होती. मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या रेलिंगवर आदळली. यामुळे रेलिंग तुटली आणि कार चालकासह समुद्राच्या पाण्यात कोसळली. या कारमधून चालक एकटाच प्रवास करत होता. कार पाण्यात कोसळल्याचे पाहून तिथे कर्तव्यावर तैनात महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान धावले आणि त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता थेट समुद्रात उडी टाकली.

चालकाचा जीव वाचला

सुरक्षा बलाच्या जवानांनी पाण्यात खोलवर चालकाला गाडीतून बाहेर काढले आणि रस्सीच्या मदतीने त्याला किनाऱ्यावर आणले. कारचालकाच्या पोटात पाणी गेले होते, तसेच मार लागल्याने तो जखमी देखील झाला होता. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी चालकच्या पोटातून पाणी काढले, यामुळे या चालकाचा जीव वाचला. वेळेवर मदत मिळाली नसती तर या चालकाचा जीव गेला असता.

या अपघाताची चौकशी होणार

या अपघातातील चालकाची जीव वाचला असला तरी आर्टिका कार अद्याप समुद्रातच आहे. या कारचा शोध घेतला जाणार आहे. या घटनेच्या वेळी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे वरिष्ठ अधिकारी, जवान, वाहतूक पोलीस , स्थानिक वरळी पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील उपस्थित होते. या घटनेमागे नेमकं काय कारण आहे ? चालकाचे नियंत्रण सुटले की वाहन खराब झाले? ब्रेक फेल झाला होता की हा ड्रंक आणि ड्रॉईव्हचा प्रकार आहे याबाबत चौकशी सुरु करण्यात आली आहे. यानंतर आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.