AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर मुंबईचा महापौर भविष्यात मराठी कसा होईल, मनसे नेत्याचा रोखठोक सवाल

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजप मुंबईतून मराठी चेहरा पुसून टाकण्याचा आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा कट रचत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

तर मुंबईचा महापौर भविष्यात मराठी कसा होईल, मनसे नेत्याचा रोखठोक सवाल
raj thackeray devendra fadnavis
| Updated on: Dec 29, 2025 | 2:19 PM
Share

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धडाडीचे नेते अविनाश जाधव यांनी भाजपच्या उमेदवारी यादीवर आणि त्यांच्या धोरणांवर सडकून टीका केली आहे. भाजप मुंबईतून मराठी चेहरा पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा मोठा कट आहे, असा खळबळजनक आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे.

अविनाश जाधव यांनी भाजपच्या ६६ उमेदवारांच्या यादीचे विश्लेषण करत म्हटले की, “भाजपने जाहीर केलेल्या ६६ उमेदवारांपैकी तब्बल २० उमेदवार हे उत्तर भारतीय आहेत. जर मुंबईसारख्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर परप्रांतीयांना तिकीट दिले जाणार असेल, तर मुंबईचा महापौर भविष्यात मराठी कसा होईल? हा केवळ निवडणुकांचा प्रश्न नसून मुंबईच्या अस्मितेवर झालेला हल्ला आहे, असे अविनाश जाधव म्हणाले.

ठाकरे नावाचा ब्रँड आजही तितकाच प्रभावी

भाजपचे मनसुबे ओळखून आता ठाकरे बंधूंनी एकत्र येणे काळाची गरज आहे. जर आपण विभागले गेलो, तर हे लोक मुंबई आपल्या हातातून हिरावून घेतील. महाराष्ट्र आणि मुंबईच्या राजकारणात ठाकरे नावाचा ब्रँड आजही तितकाच प्रभावी आहे आणि तोच या संकटातून मराठी माणसाला वाचवू शकतो, असे अविनाश जाधव यांनी म्हटले. तसेच केवळ भाजपच नाही तर एकनाथ शिंदे गटावरही त्यांनी निशाणा साधला.

“उत्तर भारतीय आणि परप्रांतीय लोकांना उमेदवारी देण्याचा सपाटा शिंदे गटानेही लावला आहे. मुंबई तोडण्याचा हा एक पद्धतशीर घाट घातला जात आहे. पण त्यांनी लक्षात ठेवावे की, आजही मुंबईत ४० टक्के मराठी माणूस खंबीरपणे उभा आहे. हा मराठी माणूस भारतीय जनता पार्टीला त्यांची खरी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला.

मनसे आता पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार

धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरे यांनाच मिळायला हवे आणि भारतीय न्यायव्यवस्था त्यांना नक्कीच न्याय देईल. पराग शहा यांच्यासारखे नेते जेव्हा मारहाण करतात, तेव्हा त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, यावरून सत्ताधारी पक्षाचा उद्दामपणा दिसून येतो. जोपर्यंत राज ठाकरे मुंबईत आहेत, तोपर्यंत मराठी माणसाच्या केसालाही धक्का लागणार नाही. मराठी माणूस फक्त राजसाहेबांच्या नेतृत्वाखालीच सुरक्षित आहे, असा ठाम विश्वास अविनाश जाधव यांनी व्यक्त केला. तसेच मनसे आता पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असून, उमेदवार अर्ज भरताना मोठे शक्तीप्रदर्शन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.